शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

काेराेनाचे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:37 AM

गडचिराेली : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या तसेच ग्रामीण विकासाचे कार्य करीत काेराेना आजारामुळे मृत्यू पावलेल्या गडचिराेली जिल्ह्यातील जिल्हा ...

गडचिराेली : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या तसेच ग्रामीण विकासाचे कार्य करीत काेराेना आजारामुळे मृत्यू पावलेल्या गडचिराेली जिल्ह्यातील जिल्हा परिषद, राज्य सरकारी सेवेतील ग्रामसेवक, आराेग्य, शिक्षक, तलाठी व इतर कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व ग्रामसेवक युनियनने केली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २२ एप्रिल राेजी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून काेराेना महामारीच्या संकटाला ताेंड देत महाराष्ट्रातील अनेक गावे, खेडे, वाड्या सुरक्षित ठेवण्यासाठी गावातील विविध विकास समित्यांच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांना साेबत घेऊन सरपंच, ग्रामसेवक, आराेग्य कर्मचारी, पाेलीस, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी काेराेनाविरुद्धच्या लढाईत स्वत:ला झाेकून दिले. गृहभेटी, रुग्ण सर्वेक्षण, विलगीकरण, चेकपाेस्ट, मास्क वापर, सॅनिटायझर, फवारणी, निर्जंतुकीकरण, पररजिल्ह्यातून आलेल्या निराधार, गरजू, गरीब कुटुंबांना निवास, भाेजन व इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. संपूर्ण देशात लाॅकडाऊनद्वारे बंद असताना तसेच अनेक शासकीय खासगी क्षेत्रामध्ये वर्क फ्राम हाेम सुरू असताना गावपातळीवरील या मंडळींनी जिवाची काेणतीही पर्वा न करता काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी पूर्ण सहकार्य करीत आहेत. असे काम करतानाच गडचिराेली जिल्ह्यात ग्रामसेवक, शिक्षक, पशुधन पर्यवेक्षक व इतर कर्मचारी मिळून सात जणांना काेराेनामुळे मृत्यू झाला. अशा काेराेना याेद्धांना ५० लाख रुपयांचे विमा कवच मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

निवेदनावर जि.प.कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांची स्वाक्षरी असून यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिवांना निवेदन पाठविले आहे.