शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी

By admin | Published: September 25, 2016 1:52 AM

शहरातील हनुमान वार्ड, राजेंद्र वार्ड व कस्तुरबा वार्डातील कुटुंबधारकांना मागील २० ते ३० वर्षापूर्वी

देसाईगंज : शहरातील हनुमान वार्ड, राजेंद्र वार्ड व कस्तुरबा वार्डातील कुटुंबधारकांना मागील २० ते ३० वर्षापूर्वी बसविलेल्या जुन्याच वीज जनित्रावरून विद्युत पुरवठा सुरू होता. परिणामी क्षमता कमी झालेल्या सदर वीज जनित्रावरून गेल्या अनेक वर्षांपासून या वार्डातील नागरिकांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत होता. या संदर्भात तक्रारी केल्यानंतर महावितरणच्या येथील अधिकाऱ्यांनी तिन्ही वार्डातील नव्या वीज जनित्राचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे या वार्डात आता पुरेसा वीज पुरवठा होणार आहे. आठवडाभरात येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी सदर प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न चालविला आहे.कमी वीज दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. या संदर्भात लोकमतने तब्बल दोनदा वृत्त प्रकाशित करून या समस्येला वाचा फोडली होती. सदर वृत्ताची दखल घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हनुमान वार्ड, शिवाजी वार्ड, कस्तुरबा वार्डात सर्वेक्षण करून येथे नव्या वीज जनित्रासाठी जागेचा शोध सुरू केला. त्यानंतर नवे वीज पोल उभारण्यासाठी कस्तुरबा वार्ड, शिवाजी वार्ड, हनुमान वार्ड येथे १०० केव्हीचे तीन विद्युत जनित्र लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले. शहरी भागातील आंतर वीज जोडणी सुरू करण्यात आली असून सदर तिन्ही विद्युत जनित्र जोडणीचे काम आठवडाभरात पूर्ण होणार आहे. त्यामुळे कमी वीज दाबाच्या त्रासापासून नागरिक पूर्णत: मुक्त होणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)