शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

'मेडिगड्डा'वरुन राहुल गांधी 'केसीआर'वर बरसले; सिंचनाच्या नावाखाली जनतेची लूट केल्याचा आरोप

By संजय तिपाले | Updated: November 2, 2023 12:57 IST

तडे गेलेल्या पुलाची पाहणी : कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

गडचिरोली : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सर्वात कळीचा मुद्दा बनलेल्या महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा धरणाला २ नोव्हेंबर रोजी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी तेलंगणा केसीआर सरकारवर तोफ डागली. सिंचनाच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची लूट केली, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील सिरोंचाजवळील गोदावरी नदीवरील मेडिगड्डा धरणावरील एक किलोमीटर लांब असलेल्या पुलाचे तीन खांब खचले होते, त्यामुळे महाराष्ट्र- तेलंगणाला जोडणारा हा मार्ग आठ दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पूल खचल्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले. भाजप व काँग्रेसने केसीआर यांच्यावर टीकेची झोड उठवत या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. 

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचा भाग असलेल्या मेडिगड्डा (लक्ष्मी) धरणाला भेट दिली. तेलंगणात प्रचार दौऱ्यावर असलेले राहुल गांधी हैदराबादहून हेलिकॉप्टरने जयशंकर भूपालपल्ली येथील आंबटपल्ली गावातून धरणावर पोहोचले. यावेळी त्यांनी तडे गेलेल्या पुलाची पाहणी केली. तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी, विधिमंडळ नेते मल्लू भट्टी विक्रमार्का, आमदार श्रीधर बाबू आणि इतर नेते त्यांच्यासमवेत होते.

महिलांशी साधला संवाद

बॅरेजला भेट देण्यापूर्वी त्यांनी तेलंगणातील आंबटपल्ली गावात महिलांच्या सभेला संबोधित केले. त्यांनी केसीआर सरकारचा सर्वात मोठा घोटाळा म्हणून कालेश्वरमचे वर्णन केले. “मला हे वैयक्तिकरित्या पहायचे होते आणि म्हणूनच मी येथे आलो आहे,” असे ते म्हणाले. या प्रकल्पात मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणातील जनतेकडून एक लाख कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला. तर, या प्रकल्पाचा लोकांना फायदा झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.

 खोचक टीका, म्हणाले, हे तर कालेश्वर केसीआर एटीएम

या घोटाळ्यावर प्रकाश टाकण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी उभारलेल्या 'कालेश्वरम एटीएम'कडे बोट दाखवत राहुल गांधी यांनी 'कालेश्वरम केसीआर एटीएम' असे नामकरण करण्याची सूचना करुन खोचक टीका केली.  काँग्रेसची सत्ता आल्यास केसीआर व त्यांच्या कुटुंबीयांनी या धरणात केलेल्या गैरव्यवहाराची रक्कम जनतेला परत मिळवून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरणGadchiroliगडचिरोली