शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

राजाराम व घोटला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:23 IST

बुधवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी अचानक वादळवारा सुटला. या वादळामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळली. अनेक झाडे वीज खांबांवर कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. अहेरी तालुक्यातील राजाराम व चामोर्शी तालुक्यातील घोट परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.

ठळक मुद्देठिकठिकाणी झाडे कोसळली : वीज पुरवठाही खंडित झाल्याने अनेक गावे अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्कराजाराम (खां.)/घोट : बुधवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी अचानक वादळवारा सुटला. या वादळामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळली. अनेक झाडे वीज खांबांवर कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. अहेरी तालुक्यातील राजाराम व चामोर्शी तालुक्यातील घोट परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.राजाराम परिसरात बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक वादळी पाऊस सुरू झाला. या वादळामुळे परिसरातील अनेक विद्युत खांबे कोसळली. त्यामुळे विद्युत तारा लोंबकळत होत्या. वीज खांब कोसळल्याने या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, रायगट्टा, गोलाकर्जी आदी गावातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना रात्र उकाड्यातच काढावी लागली.परिसरात अनेक ठिकाणच्या विद्युत लाईनवर झाडे कोसळल्याने दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत झाडे काढण्याचे काम सुरू होते. दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता. जवळपास दोन दिवस विद्युत पुरवठा सुरू होणार नाही, असे विद्युत कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. पंधवरड्यापूर्वी या भागात अवकाळी पाऊस झाला होता. यावेळीसुद्धा परिसराला वादळाचा जोरदार फटका बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.विकासपल्ली येथे वादळामुळे आंबा व मक्याचे नुकसानचामोर्शी तालुक्यातील घोट परिसराला बुधवारी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वादळाचा जोरदार फटका बसला. या भागातील विकासपल्ली येथे वादळाने प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे, कवेलू तसेच छत उडाले. तसेच परिसरातील अनेक विद्युत खांब तुटून पडल्याने वीज तारा अस्ताव्यस्त झाल्या. या भागात अनेक शेतकºयांनी मक्याची लागवड केली होती. परंतु वादळामुळे मका पीक पूर्णत: जमिनीवर सपाट झाले. तसेच वादळामुळे आंबा गळून पडला. काही दिवसातच आंब्यात कोई परिपक्व होणार होती. परंतु याच कालावधीत नुकसान झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विकासपल्ली येथील जवळपास १३ घरांना वादळाचा फटका बसला. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू व टिनपत्रे उडाल्याने जवळपास ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले. वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल विभागाच्या अधिकाºयांना देण्यात आली. त्यानंतर घोटचे मंडळ अधिकारी एस.जी.सरपे, मक्केपल्लीचे तलाठी एस.एम.कुरेशी यांनी विकासपल्ली येथे पंचनामा केला.कवेलू व टिनपत्रे उडालीराजाराम परिसरात अनेक ठिकाणी झाडे व विद्युत खांब कोसळले. येथील आरोग्य उपकेंद्रासमोर मोठ्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या. सुदैवाने येथे कुणीच नसल्याने जीवितहानी टळली. याशिवाय गावातील अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू व टिनपत्रे उडाली. त्यामुळे नागरिकांना प्रचंड नुकसान सोसावे लागले.

टॅग्स :weatherहवामान