शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
4
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
5
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
7
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
8
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
9
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
10
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
11
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
13
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
15
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
16
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
18
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
19
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
20
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट

रोहयोवर ८३ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:36 AM

१ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दहा महिन्याच्या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर सुमारे ८२ कोटी ७५ लाख ८४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापैकी ४७ कोटी ६१ लाख रूपये रोहयो मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देअकुशल कामांवर भर : २१ लाख ७७ हजार मनुष्य दिवसांचा रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दहा महिन्याच्या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर सुमारे ८२ कोटी ७५ लाख ८४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापैकी ४७ कोटी ६१ लाख रूपये रोहयो मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्यात आले आहेत.गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने शेतीच्या भरवशावरच थोडाफार रोजगार येथील मजुरांना उपलब्ध होते. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतीसुद्धा वर्षभर कसली जात नाही. पावसाळ्याच्या कालावधीत केवळ धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतीच्या भरवशावर केवळ चार महिन्याचा रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर सुमारे आठ महिने कोणताही रोजगार उपलब्ध होत नसल्याने शेतमजूर व अल्पभुधारक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी केली जाते. शेतीचा हंगाम संपल्यानंतर रोहयो कामाची मागणी वाढत असल्याचा दरवर्षीचा अनुभव असल्याने या कालावधीत रोहयो प्रशासनातर्फे कामांचे नियोजन करून ठेवले जाते. कामाची मागणी होताच काम उपलब्ध करून दिले जाते.१ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दहा महिन्याच्या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामांवर सुमारे ८२ कोटी ७५ लाख ८४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण भागात रोजगाराची समस्या गंभीर असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा रोजगार हमी योजनेचा आहे. त्यामुळे एकूण खर्चाच्या सुमारे ६० टक्के खर्च मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मागील दहा महिन्यात मजुरांच्या मजुरीवर सुमारे ४७ कोटी ६१ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. कामासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करणे व कुशल कामांवर सुमारे ३१ कोटी २० लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. एकुण खर्चाच्या तुलनेत हे प्रमाण ३९.५९ टक्के एवढे आहे. रोहयो प्रशासनावर तीन कोटी ९४ लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे रोहयोचे अंदाजपत्रक सुमारे ५२ कोटी २१ लाख रूपयांचे होते. मागील दहा महिन्यांच्या कालावधीत २१ लाख ७७ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करण्यात आली आहे. तर महिला मजुरांच्या कामाचे प्रमाण ४७.६३ टक्के एवढे आहे. प्रत्येक कुटुंबाला सरासरी ३३.६५ दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.सरासरी २०५.६३ रूपये मजुरीरोजगार हमी योजनेचे काम करताना मजुरी हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. मजुराला त्याच्या कामाप्रमाणे मजुरी मिळाली नाही तर तो त्या कामावर न येता त्याऐवजी दुसरे काम शोधत असतो. रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांना टिकवून ठेवायचे असेल तर त्यांना बाहेरच्या मजुरीच्या तुलनेत जास्त मजुरी मिळणे आवश्यक आहे. रोजगार हमी वरील मजुराला त्याच्या कामानुसार मजुरी दिली जाते. गडचिरोली जिल्ह्यात सरासरी २०५.६३ रूपये एवढी प्रत्येक दिवसाची मजुरी देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील इतर व्यवसायातील मजुरीचे दर बघितले तर रोहयोच्या मजुरीचे दर सर्वसाधारण चांगले असल्याने रोहयोच्या कामास मजूर पसंती देतात.इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडीरोजगार हमी योजनेचे काम उपलब्ध करून देण्यात गडचिरोली जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे दिसून येते. २०१३-१४ या वर्षात रोजगार हमी योजनेवर सुमारे ६२ कोटी ६९ लाख रूपये खर्च करण्यात आले. २०१४-१५ मध्ये ९८ कोटी ४२ लाख, २०१५-१६ मध्ये १३२ कोटी ४७ लाख, २०१६-१७ मध्ये १३६ कोटी १३ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. मागील पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता दरवर्षी रोजगार हमी योजनेच्या कामावर अधिकचा खर्च होत असल्याचे दिसून येते. मजुरांची मजुरी वेळेवर उपलब्ध करून देण्यातही गडचिरोली जिल्हा आघाडीवर आहे. रोहयोच्या नियमानुसार आठवडा संपताच संबंधित मजुराची मजुरी त्याच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक आहे. सुमारे ७१.७ टक्के मजुरी १५ दिवसांच्या आत देण्यात आली आहे.