शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

शाळांमध्ये सुरक्षा समितीसह, सखी सावित्री समिती होणार गठित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 1:49 PM

जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश : अधिकारी, केंद्रप्रमुखांसह मुख्याधापकांची आभासी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा काही ठिकाणी घडलेल्या अनुचित प्रकारांवरून पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. असे प्रकार यापुढे घडू नयेत, यासाठी शाळांमध्ये सुरक्षा समितीसह सखी सावित्री समिती गठित करून तक्रार पेट्या बसविल्या जाणार आहेत. यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गुरूवारी पार पडलेल्या मुख्याध्यापकांच्या आभासी बैठकीत दिले.

मुलींच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दैने यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, आदिवासी विभागांतर्गत आश्रम शाळा, समाजकल्याणच्या आश्रम शाळा आदींच्या मुख्याध्यापकांची आभासी पद्धतीने बैठक घेतली. दरम्यान, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी शासन निर्णयातील तरतुदी स्पष्ट करून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या वेबसाइटबाबत आणि त्यातील सुविधांबाबत माहिती सर्व शाळांमध्ये नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्याची सूचना दिली.

मुख्याध्यापकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई शाळांमध्ये तक्रार पेटी बसविली जाणार आहे. वेळोवेळी तक्रार पेटी उघडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरून शिस्तभंगाची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तर शाळेची मान्यता होणार रद्द 

  • जिल्ह्यातील सर्व शाळा व शाळेच्या परिसरात एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, या बाबीचे पालन न झाल्यास शाळेचे अनुदान रोखणे, शाळेची मान्यता रद्द करणे, आदी कारवाई केली जाणार आहे. 
  • शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणे, चारित्र्य पडताळणीकरून पोलिसांकडून अहवाल घेणे, सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे.

दारू पिऊन शाळेत जाणे पडणार महागात शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शाळा व्यवस्थापनाने तर दक्ष राहणे आवश्यकच आहे. सोबतच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किवा अन्य कोणतीही व्यक्ती शाळेत दारू पिऊन येणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले.

अनुचित घटना दडविल्यास... शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार उघडल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन, संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब २४ तासांच्या आत कळवावी. सदर अशी अनुचित घटना दडवून ठेवल्यास संबंधित व्यक्ती, मुख्याध्यापक, संस्था गंभीर शास्तीस पात्र ठरतील.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली