शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी वाटा, राहुल गांधी नाराज? संजय राऊत म्हणाले, “आम्ही तोलामोलाचे आहोत...”
2
Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या
3
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
4
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!
5
Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!
6
ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
7
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
8
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
9
"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत
10
AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा
11
Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?
12
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
13
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
14
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
15
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
16
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
17
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
18
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
19
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
20
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता

‘ती’ अधिसूचना रद्द करण्यासाठी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2022 5:00 AM

 हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक चौथी पास तसेच दहावी पास या शैक्षणिक अर्हतेवर केल्या गेली होती. ९० दिवसांच्या कामाचा अनुभव असल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय नोकरीत आरोग्य सेवक एम. पी. डब्ल्यूच्या जागेवर नेमणुकीसाठी ५० टक्के कोटा राखीव असायचा. परंतु शासनाने तो कोटा रद्द केला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेत नियमित क्षेत्र कर्मचारी गट ‘ड’चे फार्म भरण्यासाठी आत्ता ९० दिवसांऐवजी १८० दिवस अनुभवाची गरज भासणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शासनाने दि. २९ सप्टेंबर २०२१ राेजी काढलेल्या अधिसूचनेमुळे हिवताप विभागात कार्यरत हंगामी फवारणी तसेच हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचे आराेग्य सेवक बनण्याचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. त्यामुळे ही अधिसूचना रद्द करावी, या मागणीसाठी सदर कर्मचारी संघर्ष करीत आहेत.  हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक चौथी पास तसेच दहावी पास या शैक्षणिक अर्हतेवर केल्या गेली होती. ९० दिवसांच्या कामाचा अनुभव असल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय नोकरीत आरोग्य सेवक एम. पी. डब्ल्यूच्या जागेवर नेमणुकीसाठी ५० टक्के कोटा राखीव असायचा. परंतु शासनाने तो कोटा रद्द केला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेत नियमित क्षेत्र कर्मचारी गट ‘ड’चे फार्म भरण्यासाठी आत्ता ९० दिवसांऐवजी १८० दिवस अनुभवाची गरज भासणार आहे.  जिल्ह्यात राज्यातील ७५ टक्के मलेरियाचा प्रादुर्भाव असूनही नियमित ऑर्डर निघत नाहीत.  २०१६ साली नियुक्त केलेल्या ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश लोकांचे ९० दिवस काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मग १८० दिवस पूर्ण करण्यासाठी अजून किती वर्ष वाट पहावी लागेल? असा प्रश्न उपस्थित केला आहे. गडचिराेली जिल्ह्यातील अनेक क्षेत्र कर्मचारी आराेग्य सेवकाच्या पदासाठी पात्र ठरू शकतात. मात्र ती अन्यायकारक अधिसूचना रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.

 बारावी विज्ञान पासची जाचक अट -    बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष गट ‘क’ चा फार्म भरण्यासाठी आत्ता बारावी सायन्स पासची अट लागू झालेली आहे. आर्ट फॅकल्टी च्या बहुतांश मुलांसाठी वेळेवर बारावी सायन्स ही अट पूर्ण करणे अशक्य आहे.  त्याशिवाय सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स सुद्धा अनिवार्य करण्यात आला आहे. बहुतांश मुलांना सायन्स नसल्यामुळे ते करणे सुद्धा अशक्य आहे. म्हणून ५० टक्के राखीव कोटा पूर्ववत करून, बारावी पास कोणत्याही शाखेतून करावे. सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पास डिप्लोमा ही अट रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना गडचिरोली द्वारा करण्यात आलेली आहे.-    मुंबई येथे आंदाेलन केल्यानंतर कर्मचारी गडचिराेली येथे पाेहाेचले. गडचिराेली येथील पत्रकार भवनात सभेचे आयाेजन करण्यात आले. या सभेत यापुढे लढा कसा द्यायचा, याचे नियाेजन करण्यात आले. सभेला जिल्हाभरातील क्षेत्र कर्मचारी उपस्थित हाेते.

 

टॅग्स :Healthआरोग्यgovernment schemeसरकारी योजना