शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
2
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
3
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
4
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
5
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
6
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
7
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
8
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
9
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
10
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
11
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
12
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
13
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
14
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
15
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
16
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
17
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
18
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
19
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
20
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?

खरिप हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यात 82 काेटींचे कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 5:00 AM

आधुनिक पद्धतीने शेती करताना पीक लागवडीचा खर्च माेठ्या प्रमाणात वाढला आहे. एवढा पैसा शेतकऱ्याजवळ राहत नसल्याने सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नव्हता. अनेक शेतकरी सावकाराकडून लुबाडले जात हाेते. शेतीत पिकलेले उत्पन्न सावकारालाच द्यावे लागत हाेते. ही बाब ओळखून शासनाने शेतकऱ्यांना बँकांनी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे असे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देउद्दिष्टाच्या केवळ ४५ वितरण, शेती मशागतीचा खर्च वाढला

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील १८ हजार ६१९ शेतकऱ्यांना बँकांमार्फत ८२ काेटी ४५ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. बँकांना १८४ काेटी २४ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. उद्दिष्टाचा विचार करता केवळ ४४.७५ टक्के कर्ज वितरण झाले आहे. आधुनिक पद्धतीने शेती करताना पीक लागवडीचा खर्च माेठ्या प्रमाणात वाढला आहे. एवढा पैसा शेतकऱ्याजवळ राहत नसल्याने सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नव्हता. अनेक शेतकरी सावकाराकडून लुबाडले जात हाेते. शेतीत पिकलेले उत्पन्न सावकारालाच द्यावे लागत हाेते. ही बाब ओळखून शासनाने शेतकऱ्यांना बँकांनी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे असे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्टही देण्यात आले आहे; मात्र बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना हात आखडता घेत असल्याचे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बँकांनी केवळ उद्दिष्टाच्या ४५.७५ टक्केच कर्ज वितरण केले आहे. 

सहकारी बँकेचा वाटा ६१ टक्के जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात एकूण ५१ शाखा आहेत. यातील बहुतांश शाखा ग्रामीण भागात  कार्यरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची नाळ या बँकेसाेबत जाेडली आहे. परिणामी बहुतांश शेतकरी याचा बँकेमधून कर्ज घेण्यासाठी प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यावर्षीच्या खरीप हंगामात १३ हजार ५६४ शेतकऱ्यांना सुमारे ५० काेटी २६ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.  जिल्ह्यातील एकूण बँकांच्या कर्ज वितरणाच्या हे प्रमाण ६१ टक्के एवढे आहे. विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वितरणात नेहमीच आघाडीवर राहते. 

दुर्गम भागातील शेतकरी कर्जाच्या याेजनेपासून अनभिज्ञ

- पीक कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी केल्यास कर्जावरील व्याज माफ केले जाते. म्हणजेच शेतकऱ्याला केवळ कर्जाची मुद्दल भरावी लागते;मात्र दुर्गम भागातील अनेक शेतकऱ्यांना या  याेजनेची माहिती नाही. त्यामुळे शेतकरी बचत गटाकडूनच कर्ज घेत असल्याचे दिसून येते. बचत गटाचेही व्याज अधिक राहते.

- जिल्ह्याच्या विस्ताराच्या तुलनेत बँकांची संख्या अतिशय कमी आहे. त्यातही एटापल्ली, भामरागड, सिराेंचा, काेरची या तालुक्यांमध्ये तर बँकांची संख्या केवळ दाेन ते तीन आहे. ५० किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्याला कर्जासाठी बँकेत जाणे परवडत नाही. अनेकांना बँकांचे व्यवहारही माहीत नाही.त्यामुळे ते पीककर्ज घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज