शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

२२ गावांमध्ये लागले सौरदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

भामरागड, अहेरी व एटापल्ली हे तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यामधील गावे घनदाट जंगलांनी व डोंगरदऱ्यांनी वेढली आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये पारंपरिक वीज पोहोचविणे कठीण आहे. जिल्ह्यातील जवळपास दीडशे गावांपर्यंत अजुनही वीज पोहोचली नाही. यामध्ये प्रामुख्याने भामरागड तालुक्यातील ५४, एटापल्ली तालुक्यातील १९ व अहेरी तालुक्यातील पाच गावांमध्ये वीज पोहोचली नाही.

ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थांचा उपक्रम : दुर्गम भागातील गावे प्रकाशली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदर्श मित्र मंडळ, धनकवडी पुणे व श्रीलक्ष्मी नृसिंह पतसंस्था बल्लारपूर तसेच आधार फाऊंडेशन यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, अहेरी, भामरागड या तीन तालुक्यांमधील २२ गावांमध्ये सौरपथदिवे लावण्यात आले आहेत. पुन्हा जवळपास २५ गावांमध्ये अशा प्रकारचे पथदिवे लावले जातील, अशी माहिती डॉ. चरणजितसिंग सलुजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.भामरागड, अहेरी व एटापल्ली हे तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यामधील गावे घनदाट जंगलांनी व डोंगरदऱ्यांनी वेढली आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये पारंपरिक वीज पोहोचविणे कठीण आहे. जिल्ह्यातील जवळपास दीडशे गावांपर्यंत अजुनही वीज पोहोचली नाही. यामध्ये प्रामुख्याने भामरागड तालुक्यातील ५४, एटापल्ली तालुक्यातील १९ व अहेरी तालुक्यातील पाच गावांमध्ये वीज पोहोचली नाही. प्रत्यक्ष वीज खांब गाडून वीज पोहोचविणे कठीण असल्याने या गावांना सौरदिवे वाटप करण्याचा निर्णय घेतला. २२ गावांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. तसेच पाच शाळांमध्येही पथदिवे लावले आहेत. तसेच १ हजार १३५ कुटुंबांना सौरदिवे देण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी पुणे येथील अतुल बेहरे, मंदार बोरकर, दत्तात्रय दारवटकर, विश्वनाथ परदेशी, प्रसाद साप्ते, शारदाबाई नरवा, रत्नप्रभा गिरे, राजेश गिरे, श्रीस्वामी समर्थ ब्राह्मण सेवा संघ नारायणगाव, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे तसेच स्व. पंडीत वाघ, रूचा वैद्य, मोहन हुल्याळकर, उज्वला देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी मदत केली, अशी माहिती डॉ. चरणजितसिंग सलुजा यांनी दिली. पत्रकार परिषदेला श्रीनिवास सुंचूवार, चेतन गायकवाड हजर होते.ही आहेत सौरपथदिवे लागलेली गावे....भामरागड तालुक्यातील तुमरकोठ, तोयनार, मरकनार, मुरूमभिशी, खारडी, कोरपर्शी, कुचेर, मुतेरकुई, अहेरी तालुक्यातील कचलेर, हिनभट्टी, आंबेझरा, तोंडेल, येलचिल टोला, एटापल्ली तालुक्यातील आबारपल्ली, बुर्गी, गुंडापुरी, गोसूमटोला, मासूमटोला या गावांमध्ये वीज पोहोचविण्यात आली आहे.