शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

गौरी-गणपतीचा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळालाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 2:13 PM

१०० रुपयांत चार जिन्नस : सण संपल्यानंतर गोडधड करणार काय?

दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गौरीगणपती सणासाठी दिला जाणारा आनंदाचा शिधा अजूनपर्यंत लाभार्थ्यांना उपलब्ध झाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये पुरवठा विभागाविषयी असंतोष निर्माण झाला आहे. ज्या सणाच्या निमित्ताने शिधा दिला जातो तो त्या कालावधीतच देण्यात यावा, अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

वर्षभरात विविध सणउत्सव साजरे केले जातात. या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्य शासनामार्फत रेशन दुकानातून काही निवडक सणांसाठी १०० रुपयांमध्ये काही निवडक जिन्नस दिले जात आहेत. नागरिकांना सदर जिन्नस कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने त्याची प्रतीक्षा करीत असतात. ज्या सणासाठी आनंदाचा शिधा जाहीर करण्यात आला आहे. त्याच सणाच्या काही दिवसांपूर्वी त्याचे वितरण होणे आवश्यक आहे. तेव्हाच त्याचे महत्त्व राहते. मात्र बऱ्याचवेळा सण संपल्यावर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळत आहे. कोणता सण कोणत्या तारखेला आहे. ही बाब पुरवठा विभागाला माहीत असते. त्यानुसार त्या सणाच्या काही दिवसांपूर्वी शिधा पोहोचेल याचे नियोजन संबंधित विभागाने करणे आवश्यक असते. मात्र नियोजन केले जात नसल्याने सणाच्या पहिले आनंदाचा शिधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

केवळ रवा पोहोचला लाभार्थ्यांना वितरित केला जाणारे धान्य सर्वप्रथम तालुकास्तरावरील गोदामात साठवले जाते. त्यानंतर त्याचे वितरण रेशन दुकानांमध्ये केले जाते. तालुक्याच्या गोदामात केवळ रवा पोहोचला आहे. उर्वरित जिन्नस तर मिळालेच नाही. ते कधी मिळणार हे पुरवठा विभागही सांगण्यास तयार नाहीत. केवळ शासनाकडून आपल्याला जिल्ह्यात शिधा मिळाला नाही, असे उत्तर देऊन पुरवठा विभागाचे अधिकारी मोकळे होतात.

कोणकोणते जिन्नस मिळणार? 

  • चार प्रकारचे जिन्नस असलेला आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये एक किलो तेल, एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर यांचा समावेश आहे. मात्र यापैकी केवळ रवा प्राप्त झाला आहे.
  • उर्वरित जिन्नस प्राप्त झाले नाहीत. गौरीचा सण तर आता संपला आहे. गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. तेही तीन, पाच व दहा दिवसांनी उठतील. त्यानंतर तर जर शिधा मिळाला तर या शिध्याचा अर्थ काय? असा प्रश्न आहे.

पुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार गडचिरोली जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा अनुभव येथील नागरिकांना अनेकवेळा आला आहे. रेशनचे धान्य लाभार्थ्यांना कधीच वेळेवर मिळत नाही. घरचे धान्य संपल्याने गरीब नागरिकांना खासगी दुकानातून धान्य खरेदी करावे लागते. त्यासाठी मजुरीचे पैसे खर्च होतात. परिणामी नियोजन बिघडते.

"ज्या सणाच्या नावाने आनंदाचा शिधा जाहीर केला आहे. तो त्या सणाच्या पूर्वी मिळणे अपेक्षित आहे. मात्र तो वेळेवर मिळत नाही. परिणामी लाभार्थी नाराज होतात. सणाच्या पूर्वी शिधा मिळेल यासाठी पुरवठा विभागाने नियोजन करावे."- अनिल भांडेकर, रेशन दुकानदार

"पुरवठा विभाग शिधा व धान्य उपलब्ध करून देत नाही. लाभार्थ्यांच्या रोषाला मात्र रेशन दुकानदारांना बळी पडावे लागते. धान्यासाठी येणारे लाभार्थी आनंदाच्या शिधासाठी विचारत आहे. त्यांना उत्तर देताना नाकीनऊ येत आहे." - रुपेश वलके, रेशन दुकानदार

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Gadchiroliगडचिरोली