शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

'हा' नियम म्हणतो, नव्या तांदळाचे वय अवघे तीन महिने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 7:20 AM

Gadchiroli News भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) नियमांनुसार चांगल्या तांदळाचे वय अवघे तीन महिने निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजुना तांदूळ ‘एफसीआय’कडून सर्रास केला जातोय नापास

मनोज ताजने

गडचिरोली : जुना तांदूळ असेल तर तो अधिक चांगला शिजतो; त्यामुळे त्याचे दरही नवीन तांदळाच्या तुलनेत जास्त असतात; पण भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) नियमांनुसार चांगल्या तांदळाचे वय अवघे तीन महिने निश्चित करण्यात आले आहे. राईस मिलर्सकडून भरडाई करून आलेला तांदूळ तीन महिन्यांपेक्षा जुना असल्यास तो सरळ ‘रिजेक्ट’ केला जात असल्यामुळे या वर्षी भरडई केलेले धानाचे लॉट नापास करण्याचे प्रमाण वाढले आहे.

राज्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. याच भागातून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना एफसीआयमार्फत तांदळाचा पुरवठा होतो. या वर्षी शेतकऱ्यांकडून खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससोबत करारनामे करून भरडाई सुरू आहे; पण मिलर्सच्या अडेलतट्टू धोरणामुळे सध्या गडचिरोली वगळता इतर जिल्ह्यांमध्ये धान भरडाई अत्यल्प प्रमाणात झाली आहे. भरडाईस होत असलेल्या या विलंबासोबत तांदळाचे लॉट नापास होण्याचे प्रमाणही वाढणार आहे. कारण केमिकल टेस्टनुसार भरडई झालेल्या तांदळाची तपासणी केली जात आहे.

अशी होते केमिकल टेस्ट

आधी भरडई केलेल्या तांदळात तुकड्याचे प्रमाण किती आहेत, हे तपासून लॉट पास केले जात होते. आता तुकड्यासोबतच केमिकल टेस्ट करून तांदूळ किती जुना आहे, हेसुद्धा तपासले जाते. प्रत्येक लॉटमधील ५ ग्रॅम तांदूळ काढून त्यात लिक्विड केमिकल टाकले जाते. त्यानंतर तांदळाचा रंग हिरवा आल्यास तो तांदूळ नवीन आहे, हे सिद्ध होऊन तो स्वीकारला जातो; पण तांदळाचा रंग पिवळा आल्यास तो तांदूळ ३ महिन्यांपेक्षा जुना आहे, असे मानून तो नाकारला जातो.

तीन महिन्यांत भरडाई अशक्य

शेतकऱ्यांकडील धानाची शासकीय खरेदी सुरू करण्यासाठी आता जवळपास ३ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे; पण लाखो क्विंटल धान अजूनही शासकीय गोदामांमध्ये आणि खरेदी केंद्रांवर भरडाईच्या प्रतीक्षेत उघड्यावर ठेवलेला आहे. धान भरडाईची संथगती पाहता तीन महिन्यांतच काय, सहा महिन्यांतही सर्व धानाची भरडाई होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत एफसीआयच्या निकषांत तो धान बसेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती