शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

हजाराे नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 05:00 IST

आंदाेलनात २० गावांमधील जवळपास दाेन हजार नागरिक सहभागी झाले हाेते. गडचिराेली तालुक्यातील बहुतांश गावांपासून जंगल दाेन ते तीन किमी अंतरावर आहे. एवढ्या परिसरात नागरिकांच्या शेती आहेत. त्यामुळे शेतीवरच जावेच लागते. शेतीवर जाणाऱ्या नागरिकांवर वाघ हल्ला करीत आहे. या वाघाचा बंदाेबस्त करावा तसेच इतरही वाघांना येेथून हटविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदाेलन करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : नागरिकांच्या जीवाचा घाेट घेणाऱ्या वाघांचा बंदाेबस्त करावा, या प्रमुख मागणीसाठी भ्रष्टाचारविराेधी जनआंदाेलन व भारतीय जनसंसद यांच्या नेतृत्वात गडचिराेली तालुक्यातील वाघ प्रभावित असलेल्या २० गावांमधील हजाराे नागरिकांनी मंगळवारी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली. शहरातील इंदिरा गांधी चाैक ते पाेटेगाव मार्गावरील वनसंरक्षक कार्यालयापर्यंत माेर्चा काढण्यात आला. माेर्चाचे नेतृत्व भ्रष्टाचारविराेधी जनआंदाेलनाचे राज्य समिती विश्वस्त डाॅ. शिवनाथ कुंभारे, भ्रष्टाचारविराेधी जनआंदाेलनाचे जिल्हा संघटक तथा जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, समाजसेवक देवाजी ताेफा, जिल्हा उपाध्यक्ष रमेश बांगरे, जिल्हा सचिव नीलकंठ संदाेकार, आंबेशिवणीचे उपसरपंच याेगाजी कुडवे, विलास निंबाेरकर, रमेश भुरसे आदींनी केले. आंदाेलनात २० गावांमधील जवळपास दाेन हजार नागरिक सहभागी झाले हाेते. गडचिराेली तालुक्यातील बहुतांश गावांपासून जंगल दाेन ते तीन किमी अंतरावर आहे. एवढ्या परिसरात नागरिकांच्या शेती आहेत. त्यामुळे शेतीवरच जावेच लागते. शेतीवर जाणाऱ्या नागरिकांवर वाघ हल्ला करीत आहे. या वाघाचा बंदाेबस्त करावा तसेच इतरही वाघांना येेथून हटविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदाेलन करण्यात आले. माेर्चा वनसंरक्षक कार्यालयात पाेहाेचल्यानंतर त्याठिकाणी सभेचे आयाेजन करण्यात आले. या सभेला विजय खरवडे यांच्यासह इतरांनी मार्गदर्शन केले. वाघाचा बंदाेबस्त करण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करू, असे आश्वासन विजय खरवडे यांनी दिले. तसेच भविष्यात माेठे आंदाेलन उभारले जाईल, असा इशारा वनविभागाला दिला. सभेनंतर मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन देण्यात आले. 

या आहेत नागरिकांच्या प्रमुख मागण्याअमिर्झा परिसरातील गावांमध्ये वाघांनी दहशत माजविली आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाघांचा बंदाेबस्त करावा, वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाख रुपयांची मदत द्यावी. कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नाेकरी द्यावी. अकार्यक्षम वनाधिकारी व वनकर्मचारी यांची हकालपट्टी करावी. चुरचुरा बिटातील ४० एकर जागेवर अवैध वृक्षताेड करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. तलाठी व वनकर्मचाऱ्याची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करावी.

 

टॅग्स :Morchaमोर्चाTigerवाघ