शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

एनपीएस बंद करून जुनी पेन्शन द्या, कर्मचारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 5:00 AM

मागील १६ वर्षांच्या कालावधीत राज्यभरातील सुमारे १ हजार ६०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाला डीसीपीएस व एनपीएस याेजनेंतर्गत काेणताही लाभ देण्यात आला नाही. मृतकाचे कुटुंब निवृत्ती वेतन,  ग्रॅज्र्युईटी आदी लाभापासून वंचित आहेत. इतरही काही अनुषंगिक लाभ अद्याप दिले गेलेले नाहीत.  एनपीएस पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी हक्काची पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक १ नोव्हेंबर २००५ पासून परिभाषित अंशदान पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली. सन २०१५ पासून या योजनेचे रूपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) झाले. ही याेजना कर्मचाऱ्यांसाठी मारक असून ती बंद करून पूर्वी प्रमाणेच जुनी पेन्शन याेजना लागू करावी, या मागणीसाठी जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमाेर ठिय्या आंदाेलन केले. मागील १६ वर्षांच्या कालावधीत राज्यभरातील सुमारे १ हजार ६०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाला डीसीपीएस व एनपीएस याेजनेंतर्गत काेणताही लाभ देण्यात आला नाही. मृतकाचे कुटुंब निवृत्ती वेतन,  ग्रॅज्र्युईटी आदी लाभापासून वंचित आहेत. इतरही काही अनुषंगिक लाभ अद्याप दिले गेलेले नाहीत.  एनपीएस पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी हक्काची पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरचे आंदाेलन अखिल भारतिय राज्य कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचे नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जिल्हा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहनकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील चडगुलवार, सरचिटणीस भास्कर मेश्राम, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, सरचिटणीस दामोधर पटले, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, श्रीकृष्ण मंगर, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेचे सचिव फिरोज लांजेवार, कोषाध्यक्ष अखिल श्रीरामवार, नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष निलू वानखेडे, आशा कोकोडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लतिफ पठाण, सचिव किशोर सोनटक्के, जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन ठाकरे, सचिव राजू रेचनकर, जि.प.महिला कर्मचारी समितीचे अध्यक्ष कविता साळवे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदेव नवघडे, सरचिटणीस बापू मुनघाटे,पांडुरंग पेशने आदी उपस्थित हाेते. 

या आहेत प्रमुख मागण्या

अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची शिफारस विधिमंडळाच्या ठरावासह केंद्र शासनाला सादर केली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनानेसुद्धा अशा शिफारशीसह प्रस्ताव केंद्र शासनाकडे तत्काळ सादर करावा.एनपीएसधारक कर्मचाऱ्यांना सद्य:स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुज्ञेय असलेले लाभ द्यावेत.शासनाकडून मिळणाऱ्या १४ टक्के अंशदान रकमेची वजावट आयकरासाठी एकूण वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी निवड झाल्या, परंतु उशिराने नियुक्ती आदेश मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 

चामोर्शी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलनजुनी पेन्शन याेजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी चामार्शी तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी चामोर्शी तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले. आंदाेलनात मंडळ अधिकारी तारेश फुलझेले, के. पी. शेरकी, डी. के. वाडके, किशोर येरगुडे, एस. पी. शेख, बी. झेड झुरे, वंदना पेशट्टीवार,. गौरव भांडेकर, विराज वासेकर, विलास निरगुळे, पुरण कुमरे, गणेश कुंभारे, विवेक नैताम, एस. ए. ठाकूर, निमेश तोडसाम, महेश मडावी, नागेश्वर रांपजी, रोहित भादेकर, व्ही. आर. वगरकर,  देवांगणा सहारे, लीना मेश्राम, महादेव झाडे, अमोल गेडाम, सावण कुळसंगे, कुणाल वानखेडे, अमोल मंगर, आनंद वाढई, चव्हाण, सुनील दुधबावरे, एम. ए. कोठारे, योगिता मडावी आदी उपस्थित हाेते.

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन