शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

लकवा प्रशासनाचा विद्यापीठालाही फटका

By admin | Published: August 03, 2014 11:22 PM

दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारने गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सद्यस्थितीत गोंडवाना विद्यापीठाच्या विविध

गोंडवाना विद्यापीठ वाऱ्यावर : मुख्यमंत्र्यांचे गडचिरोलीकडे दुर्लक्षगडचिरोली : दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारने गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सद्यस्थितीत गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्रस्तावाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहे. परंतु मागील एक वर्षांपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागातून मुख्यमंत्र्यांकडे हे प्रस्ताव मान्यतेसाठी पडून असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे मागास भागातील गोंडवाना विद्यापीठाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. २ आॅक्टोबर २०११ ला गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यात व्यवस्थापन परिषद, विदवत्त परिषद, विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, विविध अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांच्या नियुक्त्या व स्थापना होणे आवश्यक होते. या परिषदा व मंडळ यांच्या माध्यमातूनच विद्यापीठाच्या प्रत्येक निर्णयाला विधिवत मान्यता देण्याचे काम केले जाते. व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेशिवाय विद्यापीठाचे आर्थिक व प्रशासकीय निर्णय विधिवत होत नाही. तसेच विदवत्त परिषदेच्या मान्यतेशिवाय अभ्यासक्रमही विधीवत होत नाही. नव्याने निर्माण झालेल्या गोंडवाना विद्यापीठात यापैकी कशाचीही स्थापन करण्यात आलेली नाही. विद्यापीठाच्या स्थानिक प्रशासनाने आपल्या मर्जीनुसार काही विद्या शाखांचे अधिष्ठाता निवडलेले आहेत. मात्र त्यांच्या निवडीला शासनाने अजुनही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचा कारभार आतापर्यंत कुलगुरू आपल्या मर्जीनुसारच रेटून नेत असल्याचे दिसून आले. मात्र मार्च २०१४ मध्ये गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार हे ही सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या जागी नवा कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया होणे अजुन बाकीच आहे. नवा कुलगुरू निवडण्यासाठी व्यवस्थापन व विद्वत्त समित्या गठीत होणे आवश्यक आहे. यासंदर्भातील फाईल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठविली, अशी माहिती त्यांनी गडचिरोलीतील शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर व राजकीय नेत्यांना दिली आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने अद्यापही या फाईलवरची धूळ झटकलेली नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचा सारा कारभार गोंधळलेला आहे. जिल्हाधिकारीच कुलगुरू असले तरी प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्तावलेली आहे. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांवर कारवाई होण्याचेही काम ठप्प झाले आहे. दोनही जिल्ह्यात विद्यापीठाची व्यवस्थापन व विद्वत्त समिती स्थापन व्हावी यासाठी मागणी होत आहे. परंतु राज्य सरकारला व मुख्यमंत्र्यांनाही याबाबत उदासिनता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)