शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

६ हजार ९१३ जणांचे स्वेच्छा रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:10 AM

गडचिरोली जिल्ह्यात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो.

ठळक मुद्दे वर्षभरात ७ हजार २८६ बॅगचा वापर : दोन रक्तपेढीवरच जिल्हाभरातील रूग्णांचा भार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षभराच्या कालावधीत शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन रक्तपेढ्या मिळून एकूण ६ हजार ९१३ बॅग इतक्या रक्ताचे संकलन झाले. तर ७ हजार २८६ बॅग रक्ताचा वापर विविध आजाराच्या रूग्णांसाठी वर्षभरात करण्यात आला. यावरून ३७३ बॅग इतके रक्त जिल्हाबाहेरून आणावे लागले.जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्त पेढीमार्फत २०१७ मध्ये वर्षभरात १३६ रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून एकूण ५ हजार ९९० बॅग रक्ताचे संकलन झाले. यापैकी ४ हजार ८७९ बॅग रक्त जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांसाठी लावण्यात आले. तर ९१६ बॅग रक्त इतर खासगी रूग्णालयातील रूग्णांसाठी पुरविण्यात आले. जिल्ह्यात जिल्हास्तरावर गडचिरोली येथे १ व अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात १ अशा दोनच रक्तपेढ्या आहेत. तर पाच ठिकाणच्या रूग्णालयात रक्तसाठा केंद्राची व्यवस्था आहे.कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयासह आरमोरी, धानोरा, चामोर्शी व सिरोंचा या चार ग्रामीण रूग्णालयात रक्तसाठा केंद्र आहे. अहेरी येथील रक्तपेढीच्या माध्यमातून वर्षभरात ९१६ बॅग रक्ताचे संकलन करण्यात आले. तर या रक्तपेढीतर्फे १ हजार ८६ रूग्णांसाठी रक्ताचा वापर करण्यात आला. रक्तदात्यांपेक्षा रक्ताची आवश्यकता असलेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा नेहमीच तुटवडा असतो. तत्काळ व सहज सर्व रूग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. याकरिता वर्षभर विविध संघटना, राजकीय पक्ष, शाळा, महाविद्यालय, तसेच युवक व खेळाडूंचा पुढाकार वाढणे गरजेचे आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे दान जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी केले पाहिजे तेव्हाच गडचिरोली जिल्ह्यातील रक्त संकलन व साठा वाढू शकते. गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थिती व अंतराचा विचार करता गडचिरोली जिल्ह्यात रक्तपेढींची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुराव्याची गरज आहे. वाढदिवस व इतर उत्सवाच्या निमित्ताने स्वेच्छा रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.जीवन अमृत सेवेचा ९८४ रूग्णांना लाभगडचिरोली जिल्ह्यातील दोन रक्तपेढींमार्फत रूग्णांना रक्त पुरविले जाते. मात्र गंभीर रूग्णांना तातडीने रक्ताची गरज भासल्यास रक्त वेळेवर उपलब्ध होऊन संबंधित रूग्णाचे प्राण वाचावे यासाठी शासनाच्या वतीने जीवन अमृत सेवा योजना राबविली जात आहे. सदर योजनेंतर्गत जिल्हा रूग्णालयासह चार रूग्णालय संलग्नित आहेत. या योजनेंतर्गत ४० किमी अंतरापर्यंत फोन केल्यास काही वेळात रक्त पोहोचविले जाते. जीवन अमृत सेवा योजनेंतर्गत २०१७ मध्ये वर्षभरात ९८४ रूगणांना लाभ देण्यात आला. सदर योजनेमुळे ९८४ जणांचे प्राण वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात ७९, फेब्रवारी ५८, मार्च ७७, एप्रिल ६७, मे ५७, जून ६२, जुलै ८३, आॅगस्ट ९४, सप्टेंबर १५०, आॅक्टोबर १०७, नोव्हेंबर ७५, डिसेंबर महिन्यात ७५ रूग्णांना जीवन अमृत सेवेंतर्गत रक्त लावण्यात आले.