शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

रुग्णालयात पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:50 PM

जिल्हा सामान्य रूग्णालयात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. शौचालयांमध्ये पाणी नाही. परिणामी घाण निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअपुरा पाणी पुरवठा : वार्डातील शौचालयांमध्ये पसरली घाण, खरेदी करून प्यावे लागते पाणी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. शौचालयांमध्ये पाणी नाही. परिणामी घाण निर्माण झाली आहे. दुपारी ३ वाजताच्या नंतर पिण्याचेही पाणी संपत असल्याने खरेदी करून पाणी प्यावे लागत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातून आलेल्या गरीब रूग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत.गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाणी टाकी आहे. मात्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नाही. नगर परिषदेकडून पाणी खरेदी केले जाते. नगर परिषद सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक तास या प्रमाणे केवळ दोन तास पाणी पुरवठा करते. पाण्याच्या टाकीजवळ सुमारे प्रत्येकी ५० हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या दोन सम आहेत. मात्र एका तासात या सम भरत नाही. उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याचा वापर व मागणी वाढली आहे. मात्र पुरवठा तेवढाच असल्याने मागील १५ दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई रूग्णालयात निर्माण झाली आहे.प्रत्येक वार्डात शौचालये आहेत. मात्र या शौचालयांमध्ये पाणी उपलब्ध नाही. परिणामी रूग्णांना आरोग्य कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या हातपंपाजवळचे पाणी आणावे लागत आहे. पुरेसा पाणी नसल्याने शौचालयात घाण पसरली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी रूग्णालय परिसरात टाक्या आहेत. मात्र या टाक्यांमधीलही पाणी दुपारी ३ ते ४ वाजतानंतर संपते. परिणामी नागरिकांना पिण्याचे पाणी खरेदी करावे लागत आहे. गरीब रूग्णाला बॉटलचे पाणी आर्थिकदृष्ट्या झेपावणारे नाही. तरीही पाण्यावाचून राहू शकत नाही. हातपंपाचे पाणी पिल्यास आणखी तब्येत बिघडण्याची शक्यता असल्याने काटकसर करीत पाणी खरेदी करावे लागत आहे.जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी रूग्णालयातील पाण्याचा वापर होत आहे, असा आरोप काही रूग्णांनी केला आहे. असा प्रकार घडत असेल तर ही अतिशय गंभीर बाब असून रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.निवासस्थानांनाही अपुरा पाणी पुरवठारूग्णालय परिसरातच आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची निवासस्थाने आहेत. मात्र निवासस्थानांमध्येही अपुरा पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने कर्मचाºयांची बोंब आहे. विशेष म्हणजे, पाईपलाईन बरीच जुनी असल्याने बराचसा पाणी लिकेज होतो. त्यामुळे प्रत्यक्ष नळांना कमी प्रमाणात पाणी येते. परिणामी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.योजनेचा प्रस्ताव नियोजन विभागात धूळखातमहिला रूग्णालयासाठी कठाणी नदी घाटावर स्वतंत्र पाणी पुरवठा योजना बांधण्यात आली आहे. इंदिरा गांधी चौक ते जिल्हा सामान्य रूग्णालयापर्यंत पाईपलाईन टाकून याच योजनेचे पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा रूग्णालयाने तयार केला आहे. सदर प्रस्ताव नियोजन विभागात सादर केला आहे. मात्र हा प्रस्ताव नियोजन विभागात धूळखात आहे. याकडे पालकमंत्री व अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.दिवसेंदिवस रूग्णालयाचा विस्तार होत आहे. मात्र पाणी पुरवठा तेवढाच आहे. त्यामुळे कधीकधी पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. रूग्णालय परिसरात बोअरवेलवर पाणीपंप बसविण्याबाबत तत्काळ बैठक आयोजित करून पाणी समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. रूग्णालयासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना गरजेची आहे.- डॉ. अनिल रूडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली