शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

वडापाव विकायचाय, मग तुम्ही परीक्षा पास केली का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 3:01 PM

कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन : भेसळ रोखण्यासाठी अन्न विभागाची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर मात करण्यासाठी अनेक जण स्वयंरोजगार उभारतात. हा स्वयंरोजगार खाद्यपदार्थाशी संबंधित असतो. गावखेडे असोत किंवा मोठी शहरे या ठिकाणी चौकांमध्ये, रस्त्यालगत चहा, वडापाव व अन्य खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या दिसतात; परंतु आता अशा पद्धतीने व्यवसाय करता येणार नाही. विविध खाद्यपदार्थ तयार करून विक्री करायची झाली, तर त्यासाठी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे गरजेचे झाले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र यासाठी ५० गुणांची परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारच्या भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्राधिकरणाने खाद्यपदार्थ तयार करणे व हाताळणी करणाऱ्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. यासंदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये हॉटेलमालक, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची कार्यशाळा घेतली जात आहे. कार्यशाळेनंतर उपस्थित प्रतिनिधींची त्याच ठिकाणी परीक्षा घेतली जाते किंवा एखादा दिवस निश्चित केला जातो. अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुन्हा परीक्षा देण्यासाठी दिवस निश्चित केला जातो. 

जिल्ह्यात अन्न विभागातर्फे कार्यशाळा घेऊन हॉटेल विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणात त्यांना अन्न पदार्थ हाताळणे, स्टोअर करणे, नाशवंत पदार्थ साठवणूक करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाते. कार्यशाळेनंतर संबंधितांना प्रमाणपत्र वाटप केले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत परीक्षा घेतलेली नाही. 

दूध विकणाऱ्यांची घेणार का परीक्षा? जिल्ह्यात शासकीय दूध संकलन करणाऱ्या संस्था नाहीत. खुल्या पद्धतीने दुधाची विक्री घरोघरी केली जाते किंवा ज्या प्रकल्पांमध्ये दूध हाताळणी होते, तेथील कर्मचारी किंवा मालकांची परीक्षा घेणार काय, असा प्रश्न आहे.

कोणाला ही परीक्षा द्यावी लागणार? हॉटेलचालक- मालक, कुक, आईस्क्रीम गाडीचा चालक-मालक, वडापाव गाडीचालक, चहाची टपरीचालक, घरपोच भोजन पुरवठा करणारे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे व्यावसायिक, मिठाई दुकानदार, केक-खवा तयार करणारे व्यावसायिक यासह सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांना आता हे प्रशिक्षण आणि परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे.

पास नाही तोपर्यंत द्यावी लागते परीक्षा परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुन्हा परीक्षा देण्याची सुविधा आहे. जोपर्यंत तो व्यावसायिक या परीक्षेत पास होणार नाही, तोपर्यंत त्याला परीक्षा द्यावीच लागणार आहे, असा नियम आहे. जिल्ह्यात याबाबत अजूनपर्यंत पत्र प्राप्त झालेले नाही.

"जिल्ह्यातील खाद्य पदार्थ विक्रेते, हॉटेलचालक- मालक तसेच बेकरीचालक व अन्य पदार्थ विक्रेत्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यात अजूनपर्यंत परीक्षा घेण्यात आलेली नाही."- सुरेश तोरेम, अन्न सुरक्षा अधिकारी

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली