शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

जलयुक्त शिवारची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 1:10 AM

जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावून सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणण्यात आली. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या उदासीनतेमुळे गतवर्षी व चालू वर्षाची मिळून ६९१ कामे अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत.

ठळक मुद्देदिरंगाईचा कळस : दोन वर्षांची मिळून ६९१ कामे अपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावून सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणण्यात आली. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या उदासीनतेमुळे गतवर्षी व चालू वर्षाची मिळून ६९१ कामे अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत.सन २०१८-१९ या चालू वर्षात जिल्ह्यातील एकूण १७२ गावांची निवड करून या गावांमध्ये एकूण ४ हजार ५१९ कामे मंजूर आराखड्यानुसार प्रस्तावित करण्यात आली. यापैकी ४ हजार २३८ कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. १ हजार ५८२ कामांची निविदा कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून १७२ पैकी १७ गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू करण्यात आली आहे. २८५ कामे पूर्ण झाले असून या कामांवर २०५.८९ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. चालू वर्षातील तब्बल ३०० कामे अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत. यामध्ये कृषी विभागाच्या अखत्यारित असलेले १४३, मनरेगा अंतर्गत ६७, वनविभागाचे ८३ व जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या सात कामांचा समावेश आहे.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलसंधारणाच्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या कामावर विविध यंत्रणेमार्फत एकूण ४६५.५४ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. अपूर्ण स्थितीत असलेल्या कामांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३५, धानोरा ७४, देसाईगंज १२, आरमोरी ५०, कुरखेडा ६, कोरची २६, चामोर्शी २१, मुलचेरा १४, अहेरी १८, भामरागड ३, सिरोंचा ६ व एटापल्ली तालुक्यातील ३५ कामांचा समावेश आहे. चालू वर्षात गडचिरोली तालुक्यात २१, धानोरा १५७, आरमोरी ३०, कुरखेडा ५, कोरची २३, चामोर्शी ४, मुलचेरा ११, अहेरी २१ व एटापल्ली १३ अशी एकूण २८५ कामे पूर्ण झाली आहेत.कृषी व वनविभागाची गती कमीगतवर्षी २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या कामासाठी १२२ गावांची निवड करण्यात आली. आराखड्यानुसार ३ हजार ७०३ कामे मंजूर करण्यात आली. प्रशासकीय मान्यताप्राप्त ३ हजार ६७९ कामांपैकी केवळ २ हजार ९१५ इतकी कामे पूर्ण करण्यात आली. गतवर्षीची ३९१ कामे अद्यापही अपूर्ण आहेत. यामध्ये कृषी विभागाचे सर्वाधिक २५० व वनविभागाच्या ७८ कामांचा समावेश आहे. हे दोन विभाग माघारले आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार