शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

626 हेक्टरमधील गर्भावस्थेत असलेल्या धानपिकाचे झाले तणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 05:00 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बहुतांश शेती इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भेगा पडलेल्या आहेत. काही ठिकाणी पाळ फुटलेली आहे. मात्र त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी शेवटच्या टोकापर्यंत कालव्याचे पाणी पोहोचत नाही. धरणापासून शेवटच्या टोकाला (टेल) आधी पाणी दिले गेले पाहिजे, असा नियम आहे. मात्र त्याला बगल देत  योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे वघाळापर्यंत पाणी पोहोचतच नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : पावसाने दडी मारल्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या धान पिकाला पाण्याची नितांत गरज होती. मात्र तालुक्यातील वघाळा येथील शेतकऱ्यांना इटियाडोह  धरणाचे पाणी लागू असताना त्यांच्या पिकाला पाणी मिळाले नाही. वारंवार पाण्याची मागणी करूनही इटियाडोह प्रकल्प कार्यालयाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गर्भार असलेल्या धानपिकाला वेळेवर पाणी न मिळाल्याने या गावातील तब्बल ६२६ हेक्टर धनपिक करपून ते तणसात रुपांतरीत होत आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आरमोरी येथील प्रकल्प कार्यालय गाठून आपला संताप व्यक्त केला.यावर्षीच्या खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बहुतांश शेतीइटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भेगा पडलेल्या आहेत. काही ठिकाणी पाळ फुटलेली आहे. मात्र त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी शेवटच्या टोकापर्यंत कालव्याचे पाणी पोहोचत नाही. धरणापासून शेवटच्या टोकाला (टेल) आधी पाणी दिले गेले पाहिजे, असा नियम आहे. मात्र त्याला बगल देत  योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे वघाळापर्यंत पाणी पोहोचतच नाही.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील उपकार्यकारी अभियंता हे शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी भेदभाव करतात, असा आरोप करत वघाळावासीयांनी पाण्याअभावी  मेलेल्या धानाचे तणीस घेऊन आरमोरी येथील इटियाडोहचे कार्यालय गाठले. कासवी येथील उपसरपंच प्रवीण राहाटे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठाण मांडले. धान पिकाची स्थिती जाणून घेण्यासाठी देसाईगंज येथील उपकार्यकारी अभियंता मेंढे यांना राहाटे यांनी दुचाकीवर बसवून शेतकऱ्यांच्या बांधावर नेले. यावेळी मेलेल्या  धान पिकाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली.यावेळी वघाळाचे सरपंच मिथुन प्रधान, विभागीय प्रकल्प अध्यक्ष नामदेव सोरते, सुरेश दोनाडकर, धनराज दोनाडकर, सुधाकर अलोने, रामकृष्ण धोटे, रमेश आठवले, विजय मुर्वतकार, जगन माकडे, शालू सपाटे, सतीश दोनाडकर, संतोष प्रधान, रुपेश राहाटे, अविनाश दोनाडकर यांच्यासह  माेठ्या संख्येने शेतकरी हजर हाेते.

आता पाणी नको, नुकसानभरपाईच द्या-    शेतकऱ्यांनी इटियाडोह प्रकल्पाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आमच्या उभ्या धानपिकाचे तणीस झाले, त्यामुळे आता पाणी नको, नुकसानभरपाईच द्या, अशी मागणी त्यांनी रेटून धरली. शेतकऱ्यांच्या या मागणीची पाटबंधारे विभागाकडून कितपत दखल घेतली जाते आणि काेणता तोडगा काढला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२० ते २५ टक्केच पाणी मिळालेइटियाडोह धरणाचे ४० टक्के पाणी गडचिरोली जिल्ह्याला देण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. यावर्षी प्रत्यक्षात २० ते २५ टक्केच पाणी जिल्ह्याला देण्यात आले. त्यामुळे वघाळा येथील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धानाचा घास इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेने हिरावून घेतल्या गेला. शेतकऱ्यांनी वारंवार पाण्याची मागणी करूनही वघाळा गावाला एकदाही पाणी मिळाले नाही. त्यामुळे वघाळा गावातील शेतकऱ्यांचे धान पिके नष्ट होऊन तणीस झाले आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीItiadoh Projectइटियाडोह प्रकल्प