शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

ही कसली नोकरी? १२ महिने २४ तास अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 3:19 PM

Gadchiroli : अग्निशमन विभागावर पावसाळ्यातही कामांचा बोझा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अग्निशमन विभागाला वर्षातून अगदी मोजके दिवस काम करावे लागते. मात्र आगीची घटना कधी घडेल, हे सांगता येत नाही. त्यासाठी २४ तास अलर्ट राहावे लागते. विशेष म्हणजे, पावसाळ्याच्या दिवसांतही या विभागातील कर्मचाऱ्यांना अलर्ट ठेवले जाते.

पावसाळ्यात आगीच्या घटना फार कमी घडतात. त्यामुळे या विभागावर पावसाळ्यात इतर कामे सोपविली जातात. यामध्ये प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा समावेश होते. पावसाळ्याच्या दिवसांत झाडे पडून मार्ग बंद पडल्याच्या घटना घडतात. अशावेळी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून ही समस्या दूर करावी लागते. केवळ एक चालक व एक फायरमन यांना अग्निशमनच्या कर्तव्यावर अलर्ट ठेवले जाते. इतर कर्मचारी इतर काम करीत असतात.

अग्निशमन विभाग करतोय ही सुद्धा कामे

  • लाडक्या बहिणींना मदत : अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचारी आता लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरून देण्यास मदत करीत आहेत.
  • आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी : पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारीसुद्धा या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. पावसाळ्यात ही कामे केली जात आहेत.
  • हेलिपॅडवर सेवा : पोलिस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर मंत्र्यांचे हेलिकॉप्टरने ये-जा सुरू असते. टेकऑफ व लॅन्डिंग करतेवेळी अग्निशमन वाहन तिथे ठेवले जाते.
  • झाडे कटाईची कामे : पावसाळ्याच्या दिवसांत झाड पडून एखादा रोड बंद झाला असल्यास तेथील झाड उचलण्याची जबाबदारी अग्निशमन विभाग पार पाडते.

नऊ कर्मचाऱ्यांची फौजएक सहाय्यक अग्निशमन अधिकारी, दोन चालक व सहा फायरमन अशी एकूण नऊ कर्मचाऱ्यांची फौज गडचिरोली येथे कार्यरत आहेत.

अग्निशमन विभागाने वर्षभरात १५ आगी विझवल्यागडचिरोली अग्निशमन विभागाने वर्षभराच्या कालावधीत १५ आगी विझवल्या आहेत. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान टळले.

वर्षाचे १२ महिने २४ तास अलर्टवर्षाचे १२ महिने व २४ तास अलर्ट राहावे लागते. काम नाहीच्या बरोबर असले तरी रात्रंदिवस चालक व फायरमनची ड्युटी लावली जाते. आगीची घटना कधी घडेल हे सांगता येत नाही.

उन्हाळ्यात आगीच्या घटना जास्तउन्हाळ्याच्या कालावधीत आग लागण्याच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात घडतात. त्यामुळे अलर्ट राहावे लागते.

संपूर्ण तालुक्याचा भारगडचिरोली शहरातील अग्निशमन यंत्रणेवर संपूर्ण तालुक्याचा भार सोपविण्यात आला आहे. कधी-कधी धानोरा, चामोर्शी व आरमोरी तालुक्यातसुद्धा घटना घडतात. या तालुक्यातील आग विझवण्यासाठी गडचिरोली अग्निशमन दलाला जावे लागते, हे विशेष.

अग्निशमन विभागाला आग विझवण्यासोबतच इतर कामेसुद्धा करावी लागतात. सध्या पावसाळ्याच्या दिवसांत आपत्ती व्यवस्थापनाची कामे करण्यात अग्निशमन विभागाचे अधिकारी व्यस्त आहेत. - अनिल गोवर्धन, सहायक अग्निशमन अधिकारी 

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलGadchiroliगडचिरोली