शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

तोडसा, पेठा, गर्दैवाड्यात लालपरी पोहोचणार तरी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 5:38 PM

Gadchiroli : पाच ते दहा किलोमीटर पायदळ वाट तुडवत नागरिकांना जावे लागते तालुका मुख्यालयी

लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी: नक्षल प्रभावित व दुर्गम तालुका म्हणून अहेरीची ओळख आहे. या तालुक्यात अद्यापही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट झालेली नाही. काही गावांमध्ये अद्यापही लालपरी पोहोचलेलीच नाही. पाच ते दहा किलोमीटर पायदळ वाट तुडवत नागरिकांना तालुका मुख्यालयी यावे लागते, असे चित्र आहे.

आकांक्षित जिल्हा म्हणून अहेरीत विकासकामे प्राधान्याने सुरु आहेत. मात्र, रस्ते, पुलाचा प्रश्न काही दुर्गम, अतिदुर्गम गावांमध्ये कायम आहे. परिणामी तेथे अद्यापही राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरु केलेली नाही. अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील मांड्रा, कासमपल्ली, एटापल्ली तालुक्यातील तोडसापेठा, गर्दैवाडा, बांडे, कोंदावाही, वेडमपल्ली, भामरागड तालुक्यातील विसामुंडी, लष्कर अशा अनेक गावांत आजही एसटी बस पोहोचली नाही. तालुका मुख्यालयी जाण्यासाठी येथील नागरिकांना खासगी वाहने किंवा पायदल जावे लागते

अहेरी आगारातून सुटणाऱ्या बसेस आजही अनेक दुर्गम, अतिदुर्गम भागात पोहोचत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी खराब रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे तेथे बसेस जाऊ शकत नाहीत, अशी भौगोलिक स्थिती आहे. रस्ते झाल्याशिवाय एसटी पोहोचणार नाही. त्यासाठी सरकारने धोरण बदलणे गरजेचे आहे.- सुचित कोडेलवार, प्रवासी, अहेरी

हेरी उपविभागात अनेक गावांत आज रस्ते झाले आहेत. मात्र, अद्याप बससेवा सुरु करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो आणि अहेरी गाठायला उशीर होतो. खासगी वाहनचालकांकडून आर्थिक लूटही होते. पावसाळ्याच्या दिवसांत रुग्ण, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात. ही दैना लवकर संपवावी, अशी अपेक्षा आहे.- बालाजी गावडे, प्रवासी

ज्या गावकऱ्यांना आपल्या गावात बसफेरी सुरु करायची असेल तिथे ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन मागणी करायला हवी. त्यानंतर सव्र्व्हे करून सुरक्षितता बघून बसफेरी सुरु केली जाते. नागरिकांनी मागणी केल्यास योग्य दखल घेतली जाईल.- जितेंद्र राजवैद्य, वाहतूक निरीक्षक अहेरी आगार 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली