शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
युट्यूबर पत्नीला तिच्या सहकारी युट्यूबरसोबत नको त्या अवस्थेत पाहिले...; लगेचच तिने बाजुला पडलेली ओढणी...
3
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
4
हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, स्फोटात दोन मुले जखमी
5
गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...
6
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
7
Kitchen Tips: फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड, हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स!
8
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपिचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...
9
मुलीने मारला वडिलांच्याच घरावर डल्ला, नवऱ्याच्या मदतीने चोरले ९० लाख; एका चुकीने पर्दाफाश
10
मुलींकडील आयपॅड काढून घेतले, अभ्यास करायला सांगितले, आईची थेट तुरुंगात रवानगी, पोलिसांनी केली कारवाई 
11
IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?
12
"आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान   
13
"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल
14
धमाल! आता WhatsApp वर तुम्ही ठेवू शकता मोठं स्टेटस; १ मिनिटाची लिमिट कितीने वाढवली?
15
आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका
16
डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स! क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या करुण नायरची गोष्ट
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' स्टॉक, झुनझुनवालांकडे आहेत १३ कोटींपेक्षा अधिक शेअर; किंमत ₹९५ पेक्षा कमी 
18
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीपासून ॐकार साधना सुरू करा आणि अगणित लाभ मिळवा!
19
१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या
20
तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या

दिवसेंदिवस घटस्फोटांचे प्रमाण का वाढतेय? खरंच कुटुंब व्यवस्था धोक्यात आली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:36 IST

Gadchiroli : वाढला संशयकल्लोळ ! सात जन्माचे नाते एका अर्जाने तुटले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या काही दिवसांत सोशल मीडियाचे अनेक वाईट परिणाम बघायला मिळत आहेत. याच सोशल मीडियाचा आणखी एक विपरित परिणाम समोर येतोय, तो म्हणजे सोशल मीडियामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढत चालले आहे. हे प्रमाण असेच कायम राहिल्यास कुटुंब व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील अत्यंत व्यस्त आणि वेगवान जीवनशैलीमुळे अनेकांच्या आयुष्यात विविध स्तरावर सातत्याने तणाव वाढत चालला आहे. त्यात सोशल मीडियामुळे नात्यांवरही विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. याच सोशल मीडियामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहेत. सोशल मीडियाचे काही फायदे जरूर आहेत. मात्र, त्याचा अतिरेकी वापर त्रासदायक होत चालला आहे. 

सोशल मीडियातील अनावश्यक वृत्तांमुळे मानसिक तणाव वाढत चालले आहेत. दोन समाजात विरोध निर्माण करण्याचे सर्वात मोठे व्यासपीठ सोशल मीडिया बनत आहे. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हा भविष्यासाठी अतिशय धोक्याचा आहे. काही नागरिकांना तर सोशल मीडियावर नेहमी सतर्क राहण्याचे व्यसन जडले आहे.

स्वतंत्र जगायचे आहे ?कुटुंबात राहताना काही मर्यादा पाळाव्या लागतात. मात्र, या मर्यादांना काही जण बंधने समजतात. आपणाला स्वतंत्र जगायचे आहे, असे सांगून पतीपासून फारकत घेतात.

वर्षभरात किती घटस्फोट ?जिल्ह्यात वर्षभराच्या कालावधीत जवळपास २०० घटस्फोट होतात. ही आकडेवारी कुटुंब व्यवस्था धोक्यात आणणारीच आहे. पुढे हे प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे. ही धोक्याची घंटा आहे.

समेट किती प्रकरणांत ?न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात न्यायालय दोघांत समेट घडवण्याचा प्रयत्न करते. दोघांचीही समजूत घातली जाते. मात्र, काही प्रकरणांत महिलेला घटस्फोट आवश्यक असतो. त्यावेळी मात्र न्यायालयाचा नाईलाज होते. अशा प्रकरणात न्यायालय घटस्फोट मंजूर करते.

काय आहेत घटस्फोटाची नेमकी कारणे ?

  • सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवणे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वैवाहिक संबंध संशयाच्या भोवऱ्यात येतात. सोशल मीडियामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालवल्याने संवाद कमी होतो.
  • सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नात्यांमधील कमी होत चाललेला संवाद हा या घटस्फोटांचे महत्त्वाचे कारण आहे. आधीच नोकरीतील तणाव, आर्थिक जुळवाजुळव करताना पती-पत्नीच्या नात्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. त्यात आता सोशल मीडियाचाही नात्यांवर परिणाम होऊ लागला आहे.
  • सोशल मीडियाचा वापर करताना रात्री उशिरापर्यंत अनेकजण जागे राहतात. याचा थेट परिणाम सकाळी उठण्यावर होतो. कामाची वेळ १० वाजताची असेल तर ८ वाजेपर्यंत झोपून राहत असल्यामुळे उठल्याबरोबर कार्यालयात जाण्याची तयारी करावी लागते. परिणामी कुटुंबासोबत संवाद साधता येत नाही. याचा थेट परिणाम कुटुंबातील संबंधांवर दिसून येते. त्यामुळे सोशल मीडियाचा जपूनच वापर करणे आवश्यक आहे.
टॅग्स :Divorceघटस्फोटGadchiroliगडचिरोली