शहरं
Join us  
Trending Stories
1
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
2
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
3
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
4
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
5
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
6
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
7
नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?
8
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
9
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
10
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
11
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."
12
Prajakta Mali : "तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन
13
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
14
मॉलच्या मेन गेटमधून आतही जाऊ दिलं नाही, पायऱ्यांवर पाहावी लागली वाट; Zomato चे CEO म्हणाले...
15
"...तेव्हा मला कुणी साधं भेटायलाही तयार नव्हतं..."; Bigg Boss 18 मध्ये गेलेल्या मराठी अभिनेत्रीचा कटू अनुभव
16
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
17
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
18
Share Market Opening : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; Hero, HCL मध्ये तेजी, टायटन, अदानी पोर्ट्स घसरले
19
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
20
Adani's Big Move: अदानींनी सुरू केला भारतातील 'हा' मोठा प्रोग्राम, घरातील गॅस पुरवठ्याचं चित्र बदलणार, कसा होईल फायदा?

गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:24 AM

गडचिराेली : गाव तिथे एसटी हे बसचे ब्रीदवाक्य आहे. मात्र काेराेनापासून एसटी प्रामुख्याने शहरांना जाेडणाऱ्या रस्त्यावरच धावत असताना दिसून ...

गडचिराेली : गाव तिथे एसटी हे बसचे ब्रीदवाक्य आहे. मात्र काेराेनापासून एसटी प्रामुख्याने शहरांना जाेडणाऱ्या रस्त्यावरच धावत असताना दिसून येत आहे. एसटीला आपल्या ब्रीदवाक्याचा विसर पडला काय, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ग्रामीण भागातील वाहतुकीची समस्या साेडविण्याच्या उद्देशानेच बससेवा सुरू करण्यात आली. काेराेना साथीच्या पूर्वीपर्यंत शहर व ग्रामीण भागात साेडल्या जाणाऱ्या बसेसचा ताळमेळ जाेडला जात हाेता. ग्रामीण भागातून एसटीला निश्चितच कमी प्रमाणात उत्पन्न मिळते. हे जरी मान्य केले तरी सरकारी नियंत्रणात असलेली ही सेवा आहे. एसटी आर्थिक अडचणीत असताना राज्य शासनाने अनेक वेळा मदत केली आहे. त्यामुळे उत्पन्न कमवितानाच सामाजिक जबाबदारीसुद्धा एसटीला खांद्यावर घेऊन ग्रामीण भागात बस साेडाव्या लागणार आहेत.

बाॅक्स .....

मानव विकास मिशनच्या बसफेऱ्या बंद

मानव विकास मिशनच्या बसेस विद्यार्थिनींची ने-आण करण्यासाठी साेडल्या जात हाेत्या. या बसेसमधून ग्रामीण भागातील नागरिक प्रवास करीत हाेते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थाेडा दिलासा मिळत हाेता. आता मात्र शाळा बंद असल्याने या बसेसुद्धा बंद आहेत. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन साेडल्या जात आहेत.

बाॅक्स .......

खेडगावात जाण्यासाठी ‘काळीपिवळी’चा आधार

ग्रामीण भागात जाण्यासाठी बहुतांश बसफेऱ्या बंदच असल्याने नागरिकांना काळीपिवळीचा आधार घ्यावा लागत आहे. तर काही नागरिक दुचाकीने प्रवास करीत आहेत.

बाॅक्स ......

नागपूर, चंद्रपूर मार्गावर सर्वाधिक फेऱ्या

नागपूर व चंद्रपूर मार्गावर बसला सर्वाधिक प्रवासी मिळत असल्याने या मार्गावर सर्वाधिक बसफेऱ्या साेडल्या जात आहेत. ग्रामीण भागात प्रवासी मिळत नसल्याने डिझेलचा खर्च करण्यापेक्षा एसटी फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी लाेकमतला दिली.

बाॅक्स .....

खेडेगावांवरच अन्याय का?

काेट ......

काेराेनाची साथ कमी झाल्यानंतर नागरिक तहसील स्तरावर विविध कामांसाठी जातात. मात्र बस नसल्याने काळीपिवळी वाहनाचा आधार घेत तालुकास्थळ गाठावे लागते. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातही बसफेऱ्या सुरू कराव्यात.

- प्रशांत दशमुखे, नागरिक

काेट ......

प्रत्येक वेळी आर्थिक बाबींचा विचार करेल तर खासगी बस व एसटीमध्ये काहीच फरक राहणार नाही. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे अजूनही वाहने नाहीत, त्यामुळे एसटीवरच अवलंबून राहावे लागते. ज्या मार्गावर प्रवासी मिळू शकतात, अशा मार्गांवर बसफेऱ्या सुरू करण्याची गरज आहे.

- वामन काेकीळ, नागरिक