शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

तेलंगणात अडकलेले मजूर भामरागडात परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 5:00 AM

भामरागड तालुक्यातील ११ महिला व पुरूष दोन महिन्यापूर्वी मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्याच्या भुपालपल्ली जयशंकर जिल्ह्यातील महादेवपूर गावात गेले होते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे सदर मजूर महादेवपूर गावातच अडकले. तेलंगणा सरकारने या मजुरांना रेशन व ५०० रूपयांची मदत दिली. मात्र असे किती दिवस जगायचे, असा विचार करून सदर मजूर महादेवपूरवरून पायदळ निघाले.

ठळक मुद्देगोदावरी नदीतून काढली वाट : स्वगावी पाठवून केले होम क्वॉरंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात भामरागड तालुक्यातील अनेक मजूर मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. दरम्यान त्यांनी गोदावरी नदीतून पायदळ वाट काढली. सिरोंचा तालुक्याच्या पेंटिपाका येथे पोहोचल्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासगी बसची व्यवस्था करून त्यांना भामरागडात आणले. येथे वैद्यकीय तपासणी करून त्यांना स्वगावी पाठवत त्यांच्या घरी विलगिकरणात (होम क्वॉरंटाईन) ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.भामरागड तालुक्यातील ११ महिला व पुरूष दोन महिन्यापूर्वी मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्याच्या भुपालपल्ली जयशंकर जिल्ह्यातील महादेवपूर गावात गेले होते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे सदर मजूर महादेवपूर गावातच अडकले. तेलंगणा सरकारने या मजुरांना रेशन व ५०० रूपयांची मदत दिली. मात्र असे किती दिवस जगायचे, असा विचार करून सदर मजूर महादेवपूरवरून पायदळ निघाले. गोदावरी नदी ओलांडून सिरोंचा तालुक्याच्या पेंटिपाका येथे पोहोचले. येथे पोलिसांनी त्यांना अडविल्यावर त्यांनी आपबिती कथन केली. आम्हाला घरी जाण्याची मुभा द्या, अशी विनंती केली.पोलिसांनी त्यांच्या कॅम्पमध्ये असलेल्या विलगीकरण कक्षात मजुरांना आणले. याची माहिती महसूल विभागाला दिली.२२ एप्रिलला सकाळी ८ वाजता पेंटिपाकावरून एक खासगी बसगाडीमध्ये बसवून या मजुरांना भामरागड येथे पाठविण्यात आले. भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार व न. पं. मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य चमुमार्फत या मजुरांची आरोग्य तपासणी करून घेतली. त्यानंतर त्यांना स्वगावी पाठविले. अडचणीत सापडलेल्या या मजुरांनी सिरोंचा पोलीस व महसूल प्रशासनाचे आभार मानले.होम क्वॉरंटाईनची जोखीम धोकादायकमिरची तोडाईसाठी तेलंगणा राज्यात गेलेले मजूर कोरोनाबाधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ एका वैद्यकीय तपासणीतून ते बाधित आहे किंवा नाही हे कळत नाही. तरीही या मजुरांना आपापल्या घरी पाठविण्यात आले. दोन खोल्यांच्या घरात संसार करणाºया या मजुरवर्गासाठी होम क्वॉरंटाईन होऊन राहताना इतर लोकांच्या संपर्कात येण्याचे टाळणे त्यांच्यासाठी शक्य नाही. तरीही होम क्वॉरंटाईन करण्याची जोखीम पत्करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेलंगणातून परतलेल्या मजुरांना संस्थांत्मक विलगीकरण कक्षात काही दिवस ठेवणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार