शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

फेरीबोटीसाठी दुचाकींना १५० तर चारचाकींना ६०० रुपयांचा पास; येत्या १५ दिवसांत अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:43 IST

यापुढे दुचाकींनाही शुल्क द्यावे लागणार: शिरोडकर.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गेल्या अनेक वर्षांपासून फेरीबोटीतून मोफत प्रवास करणाऱ्या दुचाकीवाल्यांना आता प्रति महिना १५० रुपयांचा पास काढावा लागणार आहे. तर पास नसल्यास प्रत्येक फेरीला १० रुपये आकारले जाणार आहेत. तसेच चारचाकी वाहनांनाही ६०० रुपयांचा महिन्याचा पास काढावा लागणार असल्याची माहिती नदी परिवाहन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

नदी आणि परिवहन खात्याकडून येत्या १५ दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली जाणार आहे. नदी परिवाहन खात्याकडे एकूण ३२ फेरीबोटी आहेत. त्यापैकी २८ फेरीबोटी या राज्यात १८ जल मागांवर कार्यरत आहेत. राज्यातील फेरीबोटीत दुचाकींना मोफत प्रवेश देण्यात येत होता. परंतु आता खात्याला मोफत सेवा देणे परवडत नसल्याने शुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. ज्या वाहकांकडे पास नसेल त्या दुचाकीवाल्यांना १० रुपये शल्क भरावे लागणार असल्याचे शिरोडकर म्हणाले.

फेरीबोटीतून वर्षाला फक्त ७० लाख रुपये इतके उत्पन्न मिळत आहे. खाते प्रति ताफ्यासाठी वर्षाला सुमारे १ कोटी रुपये खर्च करते. दर महिन्याला प्रत्येक फेरी बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या पगारावरही २.५ लाख रुपये खर्च करावे लागतात, त्यानंतर इंधन शुल्क आणि देखभाल खर्चही आहे. हे सर्व खात्याला न परवडणारे असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

नद्यांवर पूल नसल्याने गोव्यात ज्या जलमार्गावर फेरीबोट सेवा चालू आहे, त्यातील रायबंदर- चोडण फेरीसेवा ही नेहमीच वर्दळीची असते. केवळ चोडण बेटावरील लोकच या फेरीसेवेवर अवलंबून नाहीत, तर डिचोली, मये भागातील लोकही पणजीला येण्यासाठी चोडण फेरीबोटीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. हा जलमार्ग राज्यातील सर्वात व्यस्त असा जलमार्ग आहे. एका फेरीबोटीच्या दिवशी सुमारे १२० फेऱ्या होतात.

वर्षाला ४५ कोटी खर्च

खात्याला ३२ फेरीबोटी चालवण्यासाठी वर्षाला ४५ कोटी रुपये खर्च करावे लागतात. मात्र शुल्क लागू केल्यानंतर किमान ४ कोटी तरी महसूल मिळणार आहे. उत्पन्नाची खर्चाशी तुलना केली तर तर ते खूपच कमी आहे. फेरीबोट चालविण्यासाठी दररोज किमान १०० लिटरच इंधनाची गरज असते.

चारचाकीवाल्यांना आता ४० रुपये

दिवाडी- जुने गोवे, सांपेद्र-दिवाडी, रासई- दुर्भाट, केरी- तेरेखोल, पणजी-बेती, वाशी- आमई, कामुल तुयें या फेरीबोटीही नेहमीच व्यस्त असतात. मडकई- कुठ्ठाळी फेरीबोटीतून अनेक वाहनधारक वास्कोत कामा, धंद्याला जाण्याठी प्रवास करीत असतात. या वाहनधारकांना फटका बसेल. बेटांवर राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणायांना चारचाकीसाठी ये-जा करतानाचे ८० रुपये तिकीट मोजावे लागेल.

नदी परिवाहन खात्याने फक्त १५० रुपये शुल्क आकरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांना महिन्याचा पास दिला जाणार आहे. यातून ते किती वेळाही प्रवास करा शकतात. आम्ही दुचाकीवाल्यांकडून मोठी रक्कम आकारलेली नाही. - मंत्री सुभाष शिरोडकर, नदी परिवाहन खाते.

 

टॅग्स :goaगोवा