शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

रेल्वे प्रवासात हरवलेले १७ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडले

By सूरज.नाईकपवार | Updated: May 12, 2024 14:42 IST

राजापूर स्थानकावर पोहचल्यानंतर ते उतरले नंतर त्यांना काहीवेळाने आपली पत्नी विराली हिचे १७.२ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेली काळया रंगाची बॅग रेल्वेतच विसरल्याचे लक्षात आले.

मडगाव: रेल्वे प्रवासात हरवलेले १७ तोळे सोन्याचे दागिने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे सापडले.  गोव्यातील थिवी रेल्वे स्थानकावर दलाच्या जवानांनी बॅग शोधून काढले व नंतर त्या प्रवाशाला रितसर परत केले. मुंबईच्या जोगेश्वरी पुर्व येथे राहणाऱ्या विरेंद्र विलास खाडे यांचे हे दागिने होते.११ मे रोजी खाडे हे मांडवी एक्सप्रेस रेल्वेच्या जनरल डब्यातून वसई येथून महाराष्ट्रातील राजापूर दरम्यान प्रवास करीत होते. प्रवासात एका बॅगेत त्यांनी सोन्याचे दागिने ठेवले होते.

राजापूर स्थानकावर पोहचल्यानंतर ते उतरले नंतर त्यांना काहीवेळाने आपली पत्नी विराली हिचे १७.२ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेली काळया रंगाची बॅग रेल्वेतच विसरल्याचे लक्षात आले. तो पर्यंत रेल्वे पुढील प्रवासाला रवाना झाली होती. विरेंद्रने लागलीच राजापूर रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तराला गाठून त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्या स्टेशन मास्तरांनी ही गोष्ट थिवी येथील रेल्वे सुरक्षा बळांना सांगितले, दरम्यान कणकवली रेल्वे सुरक्षा बलाकडे चौकशी केली असता, जनरल बोगीत बॅग आढळली नसल्याचे सांगण्यात आले.

रेल्वे थिवी स्थानकावर पोहचल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे तपासणी केली असता ती बॅग सापडली. त्यात पाच ताेळयांचे मंगळसूत्र, ३ तोळयांचा हार, ४ तोळयांचे एकूण चार बांगडया, ३ तोळा ५ ग्रॅमच्या एकूण चार सोनसाखळी व अन्य सोन्याचे दागिने होते.त्यानंतर याबाबत विरेंद्रला माहिती दिल्यानंतर ते थिवी येथे पोहचले व नंतर त्यांनी आपल्या पत्नीला व्हिडीओ कॉल करुन दागिन्यांची ओळख पटवून घेतली.