शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

पाच दिवसांतच गोव्याच्या किनारपट्टीवर 18 कासवांना जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 17:42 IST

कांदोळी ते काणकोण या समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्यात मागच्या पाच दिवसांत तब्बल 18 मृत कासव सापडल्याने गोव्यातील पर्यावरण प्रेमीमध्ये  चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे कांदोळी ते काणकोण या समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्यात मागच्या पाच दिवसांत तब्बल 18 मृत कासव सापडल्याने गोव्यातील पर्यावरण प्रेमीमध्ये  चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागच्या दोन दिवसांत दक्षिण गोव्यातील मुरगाव ते सासष्टी या किनारपट्टी भागात सहा मृत कासव सापडल्याने गोव्यातील कासवांचे स्थान धोक्यात आले की काय ही चिंता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. मुरगावच्या जपनीस गार्डन या नावाने परिचित असलेल्या किनारपट्टीवरही एक मृत कासव सापडले.

मडगाव - कांदोळी ते काणकोण या समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्यात मागच्या पाच दिवसांत तब्बल 18 मृत कासव सापडल्याने गोव्यातील पर्यावरण प्रेमीमध्ये  चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागच्या दोन दिवसांत दक्षिण गोव्यातील मुरगाव ते सासष्टी या किनारपट्टी भागात सहा मृत कासव सापडल्याने गोव्यातील कासवांचे स्थान धोक्यात आले की काय ही चिंता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.

दक्षिण गोव्यातील सासष्टी भागात झालोर (करमणो) ते फातड्रे (वार्का) या किनारपट्टी भागात केवळ 150 मीटरच्या अंतरात ऑलिव्ह रिडले जातीची तीन कासवे मरुन पडलेली दिसली. त्याशिवाय बेताळभाटी आणि माजोर्डा येथेही असे मृत कासव सापडले. मुरगावच्या जपनीस गार्डन या नावाने परिचित असलेल्या किनारपट्टीवरही एक मृत कासव सापडले. या घटनेची वनखात्याने गंभीर दखल घेतली असून या कासवांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला याची चौकशी चालू असल्याचे विभागीय वनअधिकारी सिद्धेश गावडे यांनी सांगितले.

राजबाग, कळंगूट, कांदोळी, बोगमाळो, वेळसाव आणि बेताळभाटी या किनारपट्टी भागात याआधी केवळ तीन दिवसांतच बारा मृत कासवे सापडली होती. यातील काही कासवे नुकतीच मेली होती तर काही कासवे बऱ्याच दिवसांपूर्वी वाहून आल्याचे दिसून आले होते.गोव्यातील कासव संवर्धन मोहिमेत भाग घेतलेल्या टेरा कॉन्स्क्युयसच्या पुजा मित्र यांनी या संबंधी बोलताना वाढते प्रदूषण आणि किनारपट्टीवरील प्लास्टीक आणि इतर कच:यात झालेली वाढ यामुळेच ही कासवे मरु लागली आहेत. ही गोष्ट चिंताजनक असल्याचे त्या म्हणाल्या.

ज्या किनारपट्टी भागात कासवांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्या भागात मासेमारी प्रमाणोच जलक्रीडा प्रकार मोठय़ा प्रमाणावर आयोजित केले जातात. कासवे मरण्याचे हेही एक कारण असल्याचे सांगितले जाते. कित्येकवेळा जलक्रीडा प्रकारात ज्या हायस्पीड बोटी असतात त्यांना आपटून कासवे मरतात. कित्येकदा ती मासेमाऱ्यांच्या जाळ्यातही सापडतात मात्र मासेमारी या कासवांना जाळ्यातून सोडविण्यापेक्षा आपले जाळे फाटू नये यासाठी कासवाच्या पायाकडील भाग कापून त्यांना मोकळे करतात. अशी जखमी झालेली कासवे नंतर फार काळ जिवंत राहू शकत नाहीत अशी माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सागरातील प्लास्टीकचे वाढते प्रमाण हेही कासवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरते अशी माहिती वन खात्याचे सहाय्यक वनपाल आनंद जाधव यांनी दिली. ते म्हणाले, पाण्यातील जेली फिश हे कासवाचे खाद्य असते. हे जेली फिश पाण्यावर तरंगत असताना कासवे त्यांना खातात. कित्येकदा पाण्यावर पडलेले प्लास्टीक कासवांना या जेली फिशसारखे दिसल्यामुळे हे प्लास्टीकही ते खातात. कित्येकदा हे प्लास्टीक त्यांच्या तोंडाला चिकटते. कित्येकदा त्यांच्या नाकात ते जाते त्यामुळे गुदमरुन कासवे मरतात. पाण्यात मरुन पडलेली ही कासवे नंतर दर्याच्या लाटाबरोबर किनारपट्टीवर येऊन पडतात अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :goaगोवा