शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

गोवा फॉरवर्डचे २0 उमेदवार सप्टेंबर अखेरपर्यंत जाहीर

By admin | Published: August 19, 2016 2:08 AM

पणजी : गोवा फॉरवर्ड पक्ष आपले २0 उमेदवार सप्टेंबरअखेरपर्यंत जाहीर करणार आहे. काँग्रेसबरोबर युतीचा पर्याय पक्षाने खुला ठेवला

पणजी : गोवा फॉरवर्ड पक्ष आपले २0 उमेदवार सप्टेंबरअखेरपर्यंत जाहीर करणार आहे. काँग्रेसबरोबर युतीचा पर्याय पक्षाने खुला ठेवला असून प्रमुख १२ प्रश्न घेऊन पक्ष जनतेच्या दरबारात जाणार आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर तिंबले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाला अधिमान्यता दिल्यानंतर ही पहिलीच पत्रकार परिषद होती. तिंबलो म्हणाले की, सरकार जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर असंवेदनशील बनले आहे. विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीची हत्या केली. आमच्या आमदारांनी अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना बोलू दिले नाही. रेड कॅटेगरीतील उद्योगांना पायघड्या घालून पर्यावरणाची हानी केली जात आहे. नद्यांचे राष्ट्रीयीकरण करून सरकार मच्छीमारांचा उदरनिर्वाह तसेच मत्स्यसंपत्ती नष्ट करायला निघाले आहे. कॅसिनो तसेच अमली पदार्थांना प्रोत्साहन दिले जात आहे. उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ हा घाऊक भू-रुपांतराचा अड्डा बनला आहे. वीज दर प्रचंड वाढविले आहेत. किनारा सफाई तसेच कचरा व्यवस्थापनात घोटाळे करण्यात आले आहेत. सरकार राज्याला कर्जाच्या खाईत लोटत असून १८ हजार कोटींचे कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. शिक्षण माध्यमप्रश्नी राजकारण केले जात आहे. आणखी एक समिती स्थापन करून पुन्हा घोळ घातला आहे. सर्व मंत्रालयांमध्ये घोटाळे झाले आहेत. खाणी पूर्ण वेगाने सुरू होऊ शकलेल्या नाहीत. प्रादेशिक आराखड्याच्या प्रश्नावर जनतेची थट्टा चालवली आहे. हे १२ विषय घेऊन आम्ही आगामी निवडणुकीत जनतेच्या दरबारात जाऊ, असे तिंबले यांनी सांगितले. पक्षाचे मुख्य प्रवक्ते प्रशांत नाईक म्हणाले, की हे सरकार व्हीप काढून अविश्वास ठराव जिंकते, पण आगामी निवडणुकीत जनतेच्या दरबारात साम, दाम, दंड भेद वापरला तरी जिंकू शकणार नाही. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करताना अदानी, अंबानी यांच्याकडे नद्या गहाण टाकायला सरकार निघाले आहे, असा आरोप त्यांनी केला. मच्छीमारांचा उदरनिर्वाह नष्ट होईल तसेच अंतर्गत जलवाहतुकीवरही निर्बंध येतील, असे ते म्हणाले. याबाबत वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला. पुढील दाराने राष्ट्रीयीकरण आणि मागील दाराने खासगीकरण असा हा डाव असल्याचा आरोप तिंबले यांनी केला. प्रवक्ते तन्वीर खतिब म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठी पक्षाने रोड मॅप तयार केला असून सत्तेवर आल्यास पाव, मासळी व नारळ लोकांना सवलतीच्या दरात दिले जातील. (प्रतिनिधी)