शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कदंबच्या ५० बसेस भंगारात; १५ वर्ष जुन्या वाहनांचा 'निकाल', महामंडळाला बसेसची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 15:55 IST

राज्य सरकारने आणखी ५० बसेस घेण्याची परवानगी दिली आहे. आणि १०० इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत

नारायण गावस, पणजी: केंद्र सरकारच्या १५ वर्ष जुनी वाहने भंगारात काढण्याच्या नवीन कायद्याचा कदंब महामंडळाला बराच फटका बसला आहे. कदंब महामंडळाने एकूण ५० जुन्या १५ वर्षापर्यंतच्या बसेस भंगारात काढल्या.  तसेच काही बसेस बंद आहेत. त्यामुळे सध्या महामंडळाकडे बसेसची कमतरता भासत आहे.  यासाठी राज्य सरकारने आणखी ५० बसेस घेण्याची परवानगी दिली आहे. आणि १०० इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत, असे महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले

तुयेकर म्हणाले, सध्या कदंब महामंडळाच्या आंतरराज्य मार्गावरील अनेक बसेस बंद आहेत. तसेच ग्रामीण भागातही काही बसेसची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे  राज्यभरातील विविध शाळांमध्ये अजूनही सुमारे ७० बसेसची आवश्यकता आहे.  यासाठी  महामंडळाला १०० इलेक्ट्रिक बसेस हैदराबादच्या एका कंपनीकडून येणार आहे. यांतील फक्त त्यांनी ४ बसेस आल्या आहेत. आणखी  ९६ बसेस दिल्या जाणार आहेत. या बसेस आम्ही शाळा तसेच ग्रामीण भागात घालणार आहोत. तसेच सरकार ५० डिझेलच्या बसेस देणार त्या आंतरराज्य मार्गावर घातल्या जाणार आहेत.

तुयेकर पुढे म्हणाले, राज्यात  स्मार्ट  सिटी पणजीसाठी  मिनी कंदब इलेक्ट्रिक बसेस आल्या आहेत. पण अजून पणजी स्मार्ट  सिटीची कामे पूर्ण झालेली नाही त्याचप्रमाणे शहरातील अन्य खासगी बसेस आहे त्या मालकांशी चर्चा करुन व  याेग्य ताेडगा काढून  या बसेस सुरु केल्या जाणार आहेत. या लोकांच्या पोटावर आड येणार नाही असेही तुयेकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा