शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! आता मूळ पगाराच्या ५० टक्के पेन्शन; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2024 09:19 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंबंधी आधीच निर्णय घेतलेला असून, याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना यामुळे फार मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता त्यांना मूळ पगाराच्या ५० टक्के पेन्शन निवृत्तीनंतर मिळणार आहे. कमीत कमी १० हजार रुपये पेन्शन असेल. सरकारी तिजोरीवर यामुळे दरमहा अतिरिक्त १० कोटी रुपयांचा भार पडणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंबंधी आधीच निर्णय घेतलेला असून, गोव्यातही याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना यामुळे फार मोठा दिलासा मिळणार आहे. १ एप्रिल रोजी परिपत्रक येईल व त्यानंतर ही योजना लागू होईल. अधिकृत आकडेवारीनुसार राज्य सरकारचे सुमारे ७० हजार कर्मचारी आहेत. ते जसजसे ते निवृत्त होतील तसतसा या योजनेचा लाभ त्यांना होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोमुनिदाद संहितेत वटहुकूम आणून दुरुस्ती करण्याचा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कोमुनिदाद ज्या कामासाठी जमीन दिलेली आहे त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामासाठी जमिनीचा वापर करता येणार नाही. उदा. घर बांधण्यासाठी, शैक्षणिक कामासाठी, उद्योग किंवा सरकारी प्रकल्पासाठी जमीन दिलेली असल्यास त्या-त्या कामांसाठीच वापरावी लागेल. प्रशासक कोमुनिदादने आदेश काढावा लागेल.

हा आदेश काढल्यानंतर टीसीपी, पालिका व इतर यंत्रणांना इतर बांधकामासाठी कोणताही परवाना देता येणार नाही. यासंबंधीचा वटहुकूम लवकरच काढला जाईल. पशुसंवर्धन खात्यात कंत्राटी पद्धतीवर ७ पदे भरण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. केंद्राच्या अनुषंगाने जीएसटी कायद्यात वटहुकूम काढून दुरुस्ती केली जाईल. आयटी धोरण मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

काय आहे युनिफाइड पेन्शन योजना?

केंद्राने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ही योजना सुरू केली. योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. खात्रीशीर पेन्शन हा महत्त्वाचा भाग आहे. २५ वर्षांच्या किमान पात्रता सेवेसाठी सेवानिवृत्त होण्यापूर्वी गेल्या १२ महिन्यांत काढलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून देय असेल. कमीत कमी १० वर्षांच्या सेवा असणे आवश्यक आहे. आश्वासित कौटुंबिक निवृत्तीवेतन ६० टक्के असेल. कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर कुटुंबाला ती मिळेल. किमान १० वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यावर कमीत कमी दहा हजार रुपये पेन्शन मिळेल.

आयटी धोरणाला मुदतवाढ

राज्य मंत्रिमंडळाने २०१८च्या गोवा आयटी धोरणाच्या मुदतवाढीस मंजुरी दिली. ऑगस्ट २०१८ पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यान्वित असलेले हे धोरण गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये संपुष्टात आले होते. नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाचा वापर करून गोव्याच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा आयटी धोरण आणले होते. राज्यात १० हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे.

घरमालकावर गुन्हा

राज्यातील वाढत्या गुन्ह्यांबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे पोलिस सक्षम आहेत. रविवारी गृहखात्याची उच्चस्तरीय बैठक मी घेतली. डीजीपी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी बैठकीला उपस्थित होते. गोव्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय येतात. चोऱ्या, खून यासारख्या गुन्ह्यांमध्ये परप्रांतीयांचाच हात दिसून येतो. त्यामुळेच भाडेकरू पडताळणीसाठी आजपासून १० तारीखपर्यंत मुदत दिली असून, पडताळणी न केल्याम घरमालकाला १०१ रुपये दंड ठोठावला जाईल. शिवाय त्याच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवला जाईल. भाडेकरू पडताळणीबाबत विधेयक संमत होऊन खूप दिवस झाले. घरमालकांना पुरेसा वेळ दिलेला आहे. आता आणखी थांबणे शक्य नाही. खून, चोऱ्या कोण करतात, हे तपासा. घरमालकांनी चोरांना घरात आणून का ठेवावे, असा सज्जड इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत