शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

सर्व ११ आयटीआयचा करणार कायापालट: मुख्यमंत्री, २३५ कोटींच्या निधीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 9:46 AM

टाटा उद्योगसमूहाने १६० कोटी रुपये देऊ केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व अकराही आयटीआय केंद्रांचा तब्बल २३५ कोटी रुपये खर्चुन कायापालट केला जाईल. तसेच येत्या १५ तारखेपासून आयटीआय केंद्रांमध्ये आदरातिथ्य अभ्यासक्रम सुरू केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, टाटा उद्योगसमूहाने १६० कोटी रुपये देऊ केले आहेत. पैकी निम्मी रक्कम खर्चही केली असून, आयटीआय केंद्रांचा दर्जा सुधारण्याचे काम सुरू आहे. सरकार ७५ कोटी रुपये देणार आहे. 'आदरातिथ्य अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना सहा महिने आयटीआयमध्ये व सहा महिने ताज हॉटेलमध्ये प्रशिक्षण घ्यावे लागेल. पुढील दोन वर्षांत गोव्यात हॉटेल्स तसेच तत्सम सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा फायदाच होईल, असे मुख्यंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकारचा अधिकाधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर आहे. त्याअनुषंगाने राज्यात विविध उपक्रम सुरू आहेत. इयत्ता दहावीनंतर विद्यार्थी या अभ्यासक्रमांचा लाभ घेऊ शकतात', असे मुख्यमंत्री म्हणाले.

येत्या सोमवारी जागतिक युवा कौशल्य दिन आहे; परंतु सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत असल्याने सरकारी पातळीवरील कार्यक्रम आज, गुरुवारी कला अकादमीमध्ये होणार आहेत. 

या कार्यक्रमाला टाटा मोटर्स, ताज हॉटेल, तसेच अन्य बड्या कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच आयटीआय केंद्रांचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा व करिअर घडवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत