शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

अनुकंपा तत्त्वावर १२ जणांना नियुक्तीपत्रे- चतुर्थीत दिलासा: मुख्यमंत्र्यांहस्ते प्रदान

By किशोर कुबल | Published: August 30, 2022 2:53 PM

ड्युटीवर असताना अपघाती मरण पावलेल्या सरकारी कर्मचाºयांच्या नातलगांना अनुकंपा तत्त्वावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नियुक्तीपत्रे

पणजी : ड्युटीवर असताना अपघाती मरण पावलेल्या सरकारी कर्मचाºयांच्या नातलगांना अनुकंपा तत्त्वावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नियुक्तीपत्रे प्रदान केली. आणखी १२ जणांना सरकारी सेवेत घेण्यात आले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, ड्युटीवर असताना अपघाती मरण पावलेल्या कर्मचाºयांच्या नातलगांचे नोकरीसाठीचे अर्ज प्रलंबित ठेवले जाणार नाहीत. त्यांची तात्काळ भरती केली जाईल. बोरी येथे वीज खात्याचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात तीन कर्मचाºयांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या नातलगांना तीन महिन्यात नोकरी दिली जावी यासाठी आमचे प्रयत्न होते परंतु काही अडचणी आल्या त्या दूर करुन आता त्यांना नियुक्तीपत्रे दिलेली आहेत.

कामवार असताना हृदविकाराच्या झटक्याने किंवा अन्य प्रकारे कर्मचाºयांचे आकस्मिक निधन झाल्यास परिस्थितीनुसार निर्णय घेऊन नियुक्त्या केल्या जातील. मुख्यमंत्री म्हणाले की, चतुर्थी सणानिमित्त घरोघरी आनंदाचे वातावरण असावे यासाठी सरकारने गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, लहान व्यावसायिकांना पॅकेज अशा सर्व कल्याणकारी योजनांव्दारे १२३ कोटी रुपये घरोघर पोचवले आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे हित जपणारे आहे.

दरम्यान, कार्मिक खात्याच्या संयुक्त सचिव मेघना शेटगांवकर यांनी अधिक माहिती देताना असे सांगितले की, ‘ २0१९ पासून आतापर्यत वेगवेगळ्या खात्यांमध्ये अनुकंपा तत्त्वारवर २४६ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली आहेत. अद्याप ४९९ अर्ज प्रलंबित आहेत.

टॅग्स :goaगोवा