शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

एक तरी मंत्रिपद आरपीआयला द्याच, लोकसभेसाठीही दोन जागा हव्यात - रामदास आठवले

By किशोर कुबल | Published: October 10, 2023 2:11 PM

महाराष्ट्रात आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एक तरी मंत्रिपद रिपब्लिकन पक्षाला मिळायला हवे, अशी मागणी पक्षाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

पणजी : महाराष्ट्रात आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एक तरी मंत्रिपद रिपब्लिकन पक्षाला मिळायला हवे, अशी मागणी पक्षाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

गोवा भेटीवर आलेले आठवले यानी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला स्थान दिले जाईल, असे आश्वासन यापूर्वी दिलेले आहे, असे ते म्हणाले. पाचही राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीची सत्ता येईल तसेच लोकसभा निवडणुकीतही एनडीएला ३३० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा ठाम विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

आठवले म्हणाले कि,‘ विरोधकांना ‘इंडिया’  नाव घेण्याचा अधिकार नाही. इंडिया आमचा देश आहे. ‘इंडिया’च्या नावाने निवडणूक लढवू नये.आठवले म्हणाले की, केंद्रात मोदी सरकारने गेल्या सव्वा नऊ वर्षांच्या काळात अत्यंत चांगली कामगिरी बजावली आहे. सर्वसामान्य लोकांना बॅंक खाते म्हणजे काय हे ठाऊक नव्हते.  ५० कोटी ५५ लाख ७४ हजार लोकांची बॅंक खाती उघडली. गोव्यात २ लाख १ हजार खाती उघडण्यात आली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत ३२.५ कोटींपेक्षा अधिक कर्ज देशभारत गरजूंना मिळाले. ९ कोटी ५८ लाख लोकांना देशभरात गॅस सिलिंडर दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतून गोव्यात ३००० लोकांना घरे दिली.’

आठवले यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’चे समर्थन केले. ते म्हणाले की, वेगवेगळ्या निवडणुका घेतल्याने हजारो कोटी रुपये खर्च होतात. मोदींजींना वाटते एकाचवेळी निवडणुका व्हाव्यात परंतु ते कितपत शक्य आहे सांगता येत नाही. संसदेत कायदा करावा लागेल.’ महिला आरक्षण कायदा हे मोदीजींचे क्रांतिकारक पाऊल आहे. पत्रकार परिषदेस आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, विजय कदम, सतीश बोरगांवकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेgoaगोवा