शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

संवेदनशील क्षेत्र नकोच; वाळपई येथील बैठकीत सत्तरीवासीय आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 9:35 AM

संवेदनाशील समितीच्यावतीने क्षेत्र अभ्यास वाळपई नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सभा झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाळपई: सत्तरी तालुक्यात पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र जाहीर झाल्यास विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहेत. अभयारण्याची अधिसूचना जाहीर होऊन २४ वर्षे उलटली आहेत. ती रद्द करण्याची वारंवार मागणी केली जाते. मात्र ती अद्याप रद्द झालेली नाही. अभयारण्य क्षेत्र झाल्यास जनतेच्या उदरनिर्वाहावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे याला कोणत्याही परिस्थितीत मंजुरी देऊ नये अशी जोरदार मागणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी केली. संवेदनाशील समितीच्यावतीने क्षेत्र अभ्यास वाळपई नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सभा झाली.

यावेळी उपस्थितांनी अभयारण्य क्षेत्र झाल्यास होणारे परिणाम मांडत जनतेला आज अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यात दुप्पट वाढ होईल अशी भीती व्यक्त केली. सत्तरी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र मान्य झाल्यास त्याचे गंभीर परिणाम जनतेच्या उदरनिर्वाहावर होणार आहेत असे सांगण्यात आले. यावेळी प्रत्येकाने या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. विकासावर कोणत्या प्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात याची माहिती दिली. आमदार डॉ. दिव्या राणे, समितीचे अध्यक्ष डॉ. सुजय कुमार, डॉ. एस. सी गारगोटी, डॉ. हितेंद्र पडियाला, डॉ. रितेश जोशी, डब्लू, भारतसिंग, आर. पी. सिंग, पी. के. गाजभैया, डॉ. एस. केरकट्टी, डॉ. सुकुमार सिंग यांची उपस्थिती होती. 

समितीचे अध्यक्ष डॉ. सुजय कुमार यांनी सांगितले की भावी पिढीसाठी पर्यावरणाची जतन होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अन्यथा भावी पिढीला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर विकाससुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचे रक्षण व विकासाची गती तीव्रतेने पुढे गेली पाहिजे. सत्तरी तालुक्यातील जनतेने संवेदनशील क्षेत्राला केलेल्या विरोधाची निश्चितच दखल घेण्यात येईल.

आमदार दिव्या राणे यांनी सांगितले की, सत्तरी तालुका पूर्णपणे जंगलाने वेढलेला आहे. शेकडो वर्षापासून तालुक्यातील जनता या जंगलांमधील अनेक घटकांच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करते. यावर आघात झाल्यास उदरनिर्वाहावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. निसर्गाचे रक्षण जरूर करण्यात येईल. मात्र विकासावर त्याचे आघात होणार नाहीत याची दक्षता घ्या' असे सांगत त्यांनी संवेदनशील क्षेत्र म्हणून मंजुरी देण्यात येऊ नये याचा पुनरुच्चार केला.

सुरुवातीला उदय सावंत यांनी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर व विकासावर काय परिणाम होऊ शकतात याची माहिती दिली. भूमीपूत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस यांनी तालुक्यातील जनता कशा प्रकारे हाल सहन करत आहे ते सांगितले. अभयारण्याची अधिसूचना मंजूर झाल्यास तालुक्यातील जनता पेटून उठणार असा इशारा दिला.

सरपंच उदयसिंग राणे यांनी, विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टी या सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा दिला. बी. डी. मोटे यांनी तालुक्याच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली. उदय सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

 

टॅग्स :goaगोवा