शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

माय नेम इज नार्वेकर, आय एम नॉट नक्षली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 8:06 AM

निवृत्त झाल्यावर निवांतपणे विश्रांती घ्यायचा माझा विचार होता, पण सद्‌गुरूंच्या (पाटील) प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी परत लिहायला लागलो.

अॅड. राजेश नार्वेकर, निवृत्त अध्यक्ष प्रशासकीय लवाद

शाहरुख खानचा एक सिनेमा आहे. माय नेम इज खान! त्या सिनेमात धर्मामुळे नायकाला अतिरेकी ठरवण्यात येते, तेव्हा परत परत 'माय नेम इज खान, अॅण्ड आय एम नॉट टेररिस्ट' असे त्याला वारंवार सांगावे लागते.

खूप वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आज आठवला. मागे माननीय मुख्यमंत्र्यांनी गोमंतकात 'नक्षली' आहेत, असे म्हटले तेव्हा काहूर माजले. नेमके कोण नक्षली हे जाहीर करा, असे सगळे विरोधी पक्षातील नेते ओरडू लागले. मुख्यमंत्र्यांनी असे विधान करताच आठवड्याभरात तथाकथित धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली शिवोलीच्या एका पास्टरला अटक झाली, पण नेमके नक्षली कोण हे जाहीर झाले नाही.

निवृत्त झाल्यावर निवांतपणे विश्रांती घ्यायचा माझा विचार होता, पण सद्‌गुरूंच्या (पाटील) प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी परत लिहायला लागलो, कथा, कविता, लघु कादंबरी, एकांकिका, नाटक, राजकीय प्रहसने, असे सर्व साहित्य प्रकार हाताळून मी मराठी भाषेत नऊ पुस्तके लिहिली आहेत. माझ्या सुदैवाने (आणि वाचकांच्या दुर्दैवाने) ती सगळी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एक कोकणी साहित्यिक म्हणाले, 'महाठीत' लिहिण्याऐवजी जर मी 'कोंकणी'त लिहिले असते तर साहित्य अकादमी पुरस्कार सहज पदरात पाडून घेणे शक्य होते. आता ते कोकणीवादी खरं बोलत होते की, मुद्दाम मला 'पाइन' बोलत होते हे दामबाबच जाणे!

पण आता मला लिहायची किंवा भाषणे करायची भीती वाटते. आजपर्यंत देवा-धर्मावर खूप लिहिले, पण आता त्यांच्या वाटेला जायचे धारिष्ट्य होत नाही. हल्लीच महाराष्ट्रातील एका राजकारण्याने राम मांसाहारी होता, असे जाहीर विधान केले आणि धर्मरक्षक चवताळले. त्यात 'धर्मरक्षिता' अशा आमच्या सौभाग्यवतीही सामील झाल्या, 'काय हो, रामावर काहीही बोलतो तो. रामाने मांस खाल्ले हे कुणी सांगितले त्याला?' बायकोने मला प्रश्न केला, आयुष्यात अनुभवाने शहाण्या झालेल्या नक्यांपैकी मी एक असल्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर देणे मी टाळले.

पण बायकोच्या अंगात विरश्री संचारली, म्हणाली 'माझी आजीसुद्धा रामाची भक्तिभावाने पूजा करायची. राम राया शुद्ध शाकाहारीच होता.' 'राम तुमच्या गावात राहायचा का? तुझी आजी त्याला शाकाहारी जेवण करून द्यायची का? की तो कुणा राजस्थानीच्या 'शुद्ध शाकाहारी' भोजनालयात जेवण करायचा, असे प्रश्न करावेसे वाटले.. पण 'पूर्वानुभव' आठवले आणि गप्प राहिलो. बायकोशी वाद घालण्यात काय अर्थ आहे? न्यायालयात वाद विवाद केल्यास निदान फी चे पैसे तरी मिळतात. आणि वाद कुणा कुणाशी घालणार? काही जण तर 'राम' ही आपलीच मक्तेदारी असल्यासारखे वागतात. मुद्द्यावरून गुद्यावर येतात. मोर्चा काढण्याची, निषेध करण्याची धमकी देतात.

त्या राजकारण्याने वाद विकोपाला जातोय हे लक्षात आल्यावर वाल्मीकी रायायण, ग. दि. मांची कविता 'गीत रायायण' जे कित्येक वर्षांपूर्वी रेडिओवरून प्रसारित झाले होते, त्याचे दाखले देऊन आपले म्हणणे खरे असल्याचे साक्षी पुरावे सादर केले. ते पुरावे पडताळून पाहण्याची तसदी कुणीच घेतली नाही. मी सुद्धा!

देवाचे सोडाच ज्यांना आपण राष्ट्रपुरुष मानतो, त्या शिव छत्रपतींबद्दलही लिहायला, बोलायला मला भीती वाटते. छत्रपतींनी शाहिस्तेखानाऐवजी अफझलखानाची बोटे छाटली, असे जर चुकून मी लिहिले किंवा बोललो तर बोटातील पेनासह माझी बोटे छाटायला 'मावळे' कमी करणार नाहीत. एका इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांने 'शिवाजी अॅण्ड हिज मावळाज' असे न उच्चारता 'शिवाजी अॅण्ड हिज मवालीज' असे उच्चारले तर त्याकाळी प्रेक्षकांनी हसून माझ केले होते. आज तसे घडले तर त्या विद्यार्थ्याच्या वडिलांना 'धर्म विरोधी' ठरवले गेले असते. आजकाल 'जय श्री राम' किंवा 'हर हर महादेव' ऐकले की छातीत धडकी भरते.

श्रीराम, कृष्ण, शिवछत्रपती हे प्रत्येकाच्या हृदयात हवेत. मनात हवेत. त्यांची भक्ती व स्मरण नेहमीच करावे. त्यांच्या नावाने वाद विवाद टाळायला हवेत. हे सगळ्या भक्तांनी व मावळ्यांनी ध्यानात घ्यावे, अशी नम्र विनंती मी हात जोडून (किंवा कुर्निसात करून) करतो. श्रींची इच्छा म्हणा किंवा शिवछत्रपतींची प्रेरणा म्हणा.. पण मनात नसताना हे लेखणीतून उतरले. कोर्ट सोडून मला रस्त्यावर वाद विवाद करण्याची इच्छा नाही, कारण मी नक्षली नाही. 

(टीप : यदा कदाचित नक्षलवादींची नावे सरकारने जाहीर केली आणि त्यात चुकून (किंवा जाणून बुजून) माझे नाव झळकले, तर येत्या २२ जानेवारीला 'जय श्रीराम' असे म्हणण्याची संधी मला मिळेल की, माझेच 'राम नाम सत्य' होईल हे सांगता येत नाही. तेव्हा आजच समस्त वाचकांना 'राम राम' म्हणतो!)

 

टॅग्स :goaगोवा