शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भंडारी समाजाचा वीस जागांवर दावा; रवी नाईक यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2024 13:29 IST

विधानसभेत राखीवतेसाठी आग्रह

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेत एसटी समाजाला चार मतदारसंघ राखीव होऊन त्यांची मागणी जर पूर्ण होत असेल तर भंडारी समाजाने मागे का राहावे, अशी जोरदार भूमिका समाजाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ३५ नेत्यांनी काल, शुक्रवारी बैठक घेऊन विधानसभेत भंडारी समाजाला २० जागांच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी कृषिमंत्री रवी नाईक यांना निवेदन दिले.

सुमारे तीन तास ही बैठक चालली. एसटींना १२ टक्के लोकसंख्येच्या प्रमाणानुसार विधानसभेत चार जागा मिळणार आहेत. केंद्र सरकारने यापूर्वीच एसटी समाजाच्या मागणीची दखल घेऊन प्रक्रिया पुढे नेली आहे. त्यानंतर आता भंडारी समाजाने नव्या चळवळीची झलक काल दाखवली. भंडारी समाजाची लोकसंख्या गोव्यात ३३ टक्के आहे असे मानले जाते. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आम्हाला २० जागा मिळायला हव्यात, असा आग्रह समाजाच्या नेत्यांनी धरला आहे. गावडा, कुणबी, वेळीप आदी एसटी समाजाला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत चार जागा राखीव मिळणार आहेत. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन लोकसभेत विधेयकही आणले. भंडारी समाजालाही त्याचप्रमाणे वीस जागा विधानसभेत मिळायला हव्यात, असे नेत्यांचे म्हणणे आहे.

यावेळी दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, दिलीप परुळेकर आदी माजी मंत्री तसेच माजी आमदार किरण कांदोळकर, जयेश साळगावकर, त्याचप्रमाणे दिपक कळंगुटकर, अॅड. अमित पालेकर, देवानंद नाईक, प्रकाश कळंगुटकर आदी उपस्थित होते. रवी नाईक यांच्या बंगल्यावर हे सर्व मिळून ३५ जण जमले होते.

संघटनेच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे प्रयत्न 

येत्या दीड महिन्यात भंडारी समाजाच्या संघटनात्मक निवडणुका आहेत. या निवडणुका बिनविरोध व्हायला हव्यात यासाठीही प्रयत्न चालू आहेत. गोमॅकॉ इस्पितळ तसेच दंत महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी सरकारने लवकर अधिसूचना काढायला हवी, अशी ही मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनाही भेटणार

दरम्यान, आपल्या मागणीचे निवेदन घेऊन भंडारी समाजाचे सगळे नेते लवकरच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही भेटणार आहेत. त्यांच्यासमोर वीस जागांची मागणी ठेवली जाईल. २०२७ साली गोवा विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनाही समाजाकडून निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती मिळाली.

 

टॅग्स :goaगोवा