शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपचं ठरलं! फोंडा, साखळी पालिका स्वबळावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 8:34 AM

कोअर कमिटीच्या बैठकीत रणनीती निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मगोप सरकारमध्ये घटक अपक्ष असला तरी फोंडा पालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. फोंडा आणि साखळी दोन्ही पालिका निवडणुका स्वतःच्या ताकदीवर लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. सोमवारी कोअर कमिटीच्या बैठकीत दोन्ही पालिकांमध्ये भाजपचा झेंडा फडकावा यासाठी प्रमुखही नेमण्यात आले. फोंड्याची जबाबदारी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्याकडे तर साखळीची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे दिली आहे.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मगोपकडे भाजपची युती विधानसभा निकालानंतर झालेली आहे. फोंडा पालिका निवडणुकीसाठी युतीचा प्रश्नच नाही. तिथे रवी नाईक हे भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत. साखळीतही मुख्यमंत्री प्रमोद सावंत निवडून आलेले आहेत. दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार असताना आणखी कोणाकडे युतीचा प्रश्न येतोच कुठे?. फोंडा पालिकेत नेहमीच मगोपचे वर्चस्व राहिले आहे. गेल्यावेळीही सुरुवातीला ही पालिका मगोपकडेच होती. नंतर स्थित्यंतरे होऊन रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक नगराध्यक्ष बनले व सत्ता भाजपकडे आली. मगोपने यावेळी पालिका निवडणूक न लढवता बाजूला राहावे, असे भाजप या पक्षाच्या नेत्यांना सांगणार आहे का? असा प्रश्न केला असता तानावडे म्हणाले की, पालिका निवडणूक पक्षीय पातळीवर होत नाही, त्यामुळे निशाणी नसणार, कोणी जर अपक्ष म्हणून लढत असेल तर त्यांना अडवण्याचा प्रश्नच येत नाही. दोन्ही पालिकांमध्ये भाजपने पूर्णपणे स्वबळावरच उतरण्याचे निश्चित केले.

- फोंड्याची जबाबदारी विनय तेंडुलकर यांच्याकडे

- साखळीची जबाबदारी सदानंद तानावडे यांच्याकडे

- साखळी पालिकेवर गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे धर्मेश सगलानी गटाचे वर्चस्व होते. ही निवडणूक मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.

- रविवारी मुख्यमंत्र्यांनी काही विद्यमान नगरसेवक, संभाव्य उमेदवार तसेच मंडल पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.

- काँग्रेस व इतर पक्षांच्या आघाडीवर मात्र याबाबत सामसूम आहे. साखळीत प्रवीण ब्लॅगन 'टू गेदर फॉर साखळी पॅनेल केले असून, उमेदवारही निश्चित केल्याची माहिती मिळते.

उमेदवारही निश्चित

भाजपने दोन्ही पालिकांत बहुतांश प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित केले आहेत. अवघेच काही प्रभाग आहेत तेथे भाजपकडून, उमेदवारांसाठी चाचपणी चालू आहे. काही विद्यमान नगरसेवक आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी लॉबिंग करीत आहेत.

पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या काल पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या १८ तारखेपर्यंत सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत अर्ज सादर करता येतील. १४ रोजी सार्वजनिक सुटी असून, १६ रोजी रविवार असल्याने हे दोन दिवस अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा