शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

भाजपला मिळाले चर्चिलचे बळ; लोकसभेसाठी जाहीर केला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 10:35 AM

दोन्ही जागा भाजप जिंकणार आलेमाव यांच्याकडून दावा

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : येत्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपलाच मिळणार, असा दावा करून माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दक्षिणेत भाजपचे चर्चिलच्या रूपाने बळ आणखी वाढले आहे.

शनिवारी आलेमाव यांनी वार्का येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गुणगान गाताना त्यांना डायनॅमिक मुख्यमंत्री असे संबोधले. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या ५० व्या वाढदिनानिमित्त त्यांनी शुभेच्छाही दिल्या. प्रमोद सावंत असेपर्यंत माझा पाठिंबा भाजपला, असेही त्यांनी सांगून टाकले. बाणावली मतदारसंघाचा आमदार असताना भाजप सरकारच्या मदतीनेच आपण या मतदारसंघात भरीव विकासकामे केली. त्याबाबत आपण भाजपचा उपकृत असल्याचेही आलेमाव यांनी सांगितले. 

बाणावली मतदारसंघात आपण २०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली. सुरेश प्रभू हे केंद्रीय रेल्वेमंत्री असताना ते गोव्यात आले होते. त्यावेळी त्यांना आपण भेटून सुरावली अंडरपासच्या कामाबाबत मागणी केली असता त्यांनी ती तत्काळ संमत केली होती, याची आठवणही त्यांनी काढली. प्रमोद सावंत तसेच स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात विकासकामे राबविली.

आपण आमदार असताना बाणावलीत जी विकासकामे केली तीच सध्या या मतदारसंघात दिसत आहेत. सध्याचे आमदार फेसबुक आमदार असल्याचा टोलाही हाणताना मुख्यंमत्र्यांना तो साखळी मतदारसंघाबाबत चॅलेज करत असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. भाजप सरकारला आपण पाठिंबा दिला म्हणून गत विधानसभा निवडणुकीत आपण हरलो, असे आलेमाव म्हणाले.

लोकसभेसाठी अनेकांची गळ

लोकसभा लढविण्यास आपण इच्छुक आहेत का? असे विचारले असता, त्याबाबत काही ठरले नसल्याचे आलेमाव म्हणाले. लोक त्यावर निर्णय घेतील. कमला लोकसभा निवडणूक लढविण्याची गळ घालत आहेत. मी दोनदा लोकसभा खासदार झालो आहे. त्यावेळी खासदारांना वर्षाला एक कोटी रुपये मिळत होते. आता खासदार निधीतून एका वर्षाला ५ कोटी मिळतात, विकासकामे मात्र दिसत नाहीत. हा निधी गेला कुठे, असा सवालही त्यांनी केला.

भाजप प्रवेशाचे नंतर बघू

भाजपचे तोंड भरून कौतुक करणारे चर्चिल आलेमाव यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार आहे का, असे विचारले तेव्हा त्यांनी त्याबाबतीत सध्या काहीच विचार नसल्याचे सांगून वेळ आल्यावर बघू, असे सांगून विषय संपवला.

काँग्रेस संपल्यात जमा

मुख्यंमत्री सावंत यांनी जी विकासकामे केली आहेत ती काँग्रेस ४० वर्षेही करू शकणार नाही. काँग्रेस आता संपली आहे, ती निद्रिस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरातील ३७० कलम हटविले. चांगले काम त्यांनी केले. देशात आज शांतता आहे. या शांततेमुळे विदेशी लोक भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण