शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
4
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
5
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
7
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
8
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
9
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
10
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
11
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
12
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
13
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
14
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
15
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
16
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
17
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
18
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
19
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
20
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध

केरळ, तामिळनाडूतही भाजपची सत्ता येईल; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:19 IST

भाजपचे संघटन उभारण्यास अटल बिहारींचे मोठे योगदान

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशभरात भाजपचे संघटन उभारण्यास अटल बिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन करुन येत्या दहा वर्षात केरळ, तामीळनाडूतही भाजप सत्ता स्थापन करील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. अटल स्मृती संमेलनात ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार दिगंगर कामत, माजी आमदार दयानंद मांद्रेकर, माजी महिला मोर्चा अध्यक्ष कुंदा चोडणकर, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, सुभाष साळकर, गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, अटलर्जीनी राष्ट्र प्रथम भावनेने समर्पितपणे काम केले. रा. स्व. संघ, जनसंघ व भाजपच्या कामात स्वतःला वाहून घेतले. श्रीपाद नाईक म्हणाले की, की अटलजींचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. काँग्रेसने नेहमीच व्होट बँकेचे राजकारण केले ठराविक वर्गाचेच तुष्टीकरण केले. त्याचे परिणाम आजही देशाला भोगवे लागत आहेत. 

अटलजींच्या काळात काम केलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री रामराव देसाई हेही याप्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री शेवटी म्हणाले की, अटलजींच्या काळात काम केलेल्या सर्वांपर्यंत पोचणे कदाचीत शक्य झाले नसेल. कोणी चुकून राहिले असतील तर त्यांना अटलजींची फोटो फ्रेम पाठवून दिली जाईल.' संमेललनास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण