शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

ज्ञानदान पद्धतीत बदल आवश्यक

By admin | Published: May 01, 2016 2:25 AM

पणजी : आज आपल्या देशात चाळीस हजारांहून अधिक महाविद्यालये आहेत. तरीही आपण सर्व स्तरांमधील मुलांपर्यंत पोहोचण्यास

पणजी : आज आपल्या देशात चाळीस हजारांहून अधिक महाविद्यालये आहेत. तरीही आपण सर्व स्तरांमधील मुलांपर्यंत पोहोचण्यास कमी पडतोय. आजच्या पारंपरिक ज्ञानदानाच्या पद्धतीत कालानुरूप बदल होणे आवश्यक आहे. आजची शिक्षण पद्धती दुर्दैवाने विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करत नाहीत. सर्व प्रकारच्या भौगोलिक सीमा पार करून तंत्रज्ञानाच्या आधारे आजचे शिक्षण सर्वव्यापी होणे महत्त्वाचे आहे. आज विद्यापीठाने जागतिक ज्ञानकेंद्र बनले पाहिजे, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजय देशमुख यांनी व्यक्त केले. एस. एस. धेंपो वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारोह आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. वाय. व्ही. रेड्डी, उच्च शिक्षण संचालक प्रा. भास्कर नायक, धेंपो चॅरिटी ट्रस्टच्या विश्वस्त पल्लवी धेंपो, यतीश धेंपो, प्राचार्या डॉ. राधिका नायक आणि उपप्राचार्य हमीद खानापुरी उपस्थित होते. मिरामार येथील गास्पार डायस सभागृहात हा सोहळा आयोजित केला होता. देशमुख म्हणाले, आजच्या अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे. त्याच दृष्टीने मुंबई विद्यापीठाने पाऊल उचलले असून येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व अभ्यासक्रमांत बदल केला जाणार आहे. आपण पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडून नव्या शैक्षणिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. तरच आपण अशिक्षित मुलांपर्यंत पोहोचू, असे त्यांनी नमूद केले. राज्यातील विद्यापीठांनीही आॅनलाईन पद्धत वापरून मुली व महिलांपर्यंत पोहोचावे, असे ते म्हणाले. या वेळी इतर मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. महाविद्यालयाचे माजी प्रशासक जी. आर. सरदेसाई आणि विद्यमान प्रशासक सुनील प्रभूदेसाई यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ‘धेंपोआईट’ या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. पल्लवी धेंपो यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षाचा आढावा घेतला. पल्लवी वागळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)