शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

फेरीबोट भाड्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील - सुभाष फळदेसाई

By किशोर कुबल | Published: November 03, 2023 2:55 PM

"लोकांची इच्छा नसेल तर सरकार त्यानुसार निर्णय घेईल. गरज पडल्यास मुख्यमंत्री हस्तक्षेप करतील."

पणजी : फेरीबोट भाड्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी जनतेच्या भावनांचा विचार केला जाईल, असे नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. लोकांची इच्छा नसेल तर सरकार त्यानुसार निर्णय घेईल. गरज पडल्यास मुख्यमंत्री हस्तक्षेप करतील, असे ते म्हणाले. फेरीबोट प्रवासासाठी दुचाक्यांना तिकीट लागू करण्याबरोबरच चारचाकींसाठी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्याने लोकांमध्ये संतप्त भावना आहे त्या पार्श्वभूमीवर खात्याचे मंत्री फळदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, ' या प्रश्नावर आम्ही आमदार आणि स्थानिक नेत्यांशीही बोलू. पण माझे असे प्रामाणिक मत आहे की, त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला पाहिजे.फळदेसाई पुढे म्हणाले की,  दुचाकींसाठी तिकीट सुरू करणे आणि चारचाकी वाहनांसाठी फेरीबोट प्रवासभाडे वाढवणे यामागचा उद्देश महसूल गळती रोखणणे व डिजिटायझेशन करून महसूल मिळवणे हा आहे. ते म्हणाले की, मोफत फेरी सेवा देण्यासाठी सरकार वर्षाकाठी ४५ ते ५० कोटी रुपये खर्च करत आहे. तिकीट व पासेस च्या माध्यमातून वर्षासाठी चार ते पाच कोटी रुपये मिळाले तरीजुन्या फेरीबोटी मोडीत काढून हा महसूल अत्याधुनिक नवीन फेरीबोटी खरेदी करण्यासाठी वापरता येईल.पास घेण्याची आणि नूतनीकरणाची तसेच दैनंदिन तिकीट काढण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली जाणार आहे कारण यापूर्वी तिकीट कलेक्टरनी केलेला घोटाळा व त्यांच्या वरील कारवाई सर्वश्रुत आहे. कोणत्याही परिस्थितीत महसूल गळती रोखली जाईल.

फेरीबोटी पाण्यावर चालतात का?, हॉटेलात  चहासाठी गेलात तर सहाशे रुपये खर्च करत नाही का?- फळदेसाईंचा सवाल

फेरीबोटींसाठी इंधन तसेच इतर गोष्टींवर खर्च करावा लागतो त्या पाण्यावर चालतात का?, असा सवाल करून फळदेसाई म्हणाले की, हॉटेलात चहा पिण्यासाठी मित्रांबरोबर गेलात तरी तरी सहाशे रुपये खर्च होतात. त्यामुळे तिकीट भाड्यावर गळा काढणे योग्य नव्हे. दुचाकींसाठी महिन्याचा १५० रुपयांचा पास काढला तरी प्रति ट्रिप ५ रुपये आणि चार चाकींसाठी सहाशे रुपयांचा पास काढला तरीप्रति ट्रीप १० रुपये खर्च येईल. हे सहज परवडण्यासारखे आहे. 

टॅग्स :goaगोवा