शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

सरकारला 'भुतानी'ने पछाडले; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2024 12:35 IST

माझा संबंध नसताना दोष देऊ नका, सत्य शोधा; या प्रकरणामुळे सध्या सत्ताधारी भाजपच्या गोटात जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'भुतानी' प्रकरणात मुख्यमंत्री आक्रमक बनले आहेत. या कंपनीशी माझा कसलाही संबंध नाही. माझ्याकडे असलेल्या कोणत्याही खात्याकडून त्यांच्या प्रकल्पांना परवानगी दिलेली नाही, असा दावा करीत भू-रूपांतरण कधी झाले ते तुम्ही शोधून काढा, असे त्यांनी उलट पत्रकारांना सुचविले. या प्रकरणामुळे सध्या सत्ताधारी भाजपच्या गोटात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.

सांकवाळ येथे डोंगरफोड प्रकरणात भूतानी कंपनी सध्या गोवाभर गाजत आहे. या प्रकल्पाचे सर्व परवाने रद्द करावेत, अशी मागणी होत आहे. दोन दिवसांपूर्वीच कुजिरा येथे भुतानी पुरस्कृत एका कार्यक्रमावेळी बिगर शासकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून सरकारविरोधात घोषणा दिल्या होत्या. 

या आंदोलनाची दखल भाजपच्या स्थानिक व दिल्लीतील नेत्यांनीही घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी आपण या परवाना दिलेला नाही हे स्पष्ट करतात. तसेच आपल्याला भुतानीचे अधिकारी एक वर्षापूर्वी भेटले त्याचा फोटो आता कुणी तरी मुद्दाम व्हायरल केल्याचा संदर्भ दिला आहे.

मंगळवारी सकाळी कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी यासंबंधी प्रश्न केला असता त्यांनी भुतानी कंपनीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. या प्रकल्पाशी संबंधित कोणतीही फाईल माझ्या कार्यालयाकडून मंजूर झालेली नाही. भू-रूपांतरण किंवा सीआरझेड मंजुरी अथवा बांधकाम परवाने कोणी दिले व कधी दिले?, हे तुम्ही तपासा असे मुख्यमंत्री म्हणाले.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला भुतानी इन्फ्रा कंपनीच्या मालकासोबतचा तो फोटो वर्षभरापूर्वीचा आहे. कंपनीच्या मालकाला किंवा कोणत्याही प्रतिनिधीला मी भेटलेलो नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. सांकवाळ येथे भुतानी कंपनीकडून • मेगा प्रकल्प येऊ घातला असून तिथे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली गेल्याने तसेच डोंगरफोड झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे. राष्ट्रगीत चालू असताना मी चालत गेलो, अशा चुकीच्या बातम्या काही जण पसरवत आहेत. राष्ट्रगीताबद्दल मला नेहमीच आदर आहे आणि राष्ट्रगीत संपल्यानंतरच मी बाहेर पडलो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एका आठवड्यात स्पष्टीकरण द्या : खंडपीठ 

भुतानीच्या प्रकल्पाला साकवाळ येथील नागरिकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने भुतानी याला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. सांकवाळ येथील नागरिक नारायण नाईक, पीटर डिसोझा व इतरांनी या प्रकल्पाला मुंब उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. कंपनीचे वकील अॅड. आत्माराम नाडकर्णी यांनी या प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करणयास दोन आठवड्याची मुदत मागितली होती. परंतु, न्यायालयाने केवळ १ आठवड्याचीच मुदत दिली. पुढील सुनावणी २६ रोजी होणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत