शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

सावंत-राणे मनोमिलन गरजेचे; कोअर टीमच्या अनेक सदस्यांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2024 9:36 AM

नोकरभरतीचा मुद्दा ठरला नाजूक, लोकमत'ने दिले होते सर्वप्रथम २७ सप्टेंबर रोजी वृत्त...

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात तूर्त नेतृत्वबदल किंवा मंत्रिमंडळ फेररचना होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत सोमवारी रात्री मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची श्रेष्ठींसोबतची बैठक यशस्वी झाली आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाले की नाही हे कदाचित महाराष्ट्र व गोवाप्रश्नी दिल्लीत एकत्र बैठक होणार वादांचे विषय पोहोचले श्रेष्ठींपर्यंत, तीन नेत्यांना निमंत्रण शक्य; कर्मचारी निवड आयोग कळीचा मुद्दा अन्य राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच्या काळात कळून येईल. सावंत व राणे यांच्यात मनोमिलन होणे भाजपच्या हिताच्यादृष्टीने गरजेचे अशी भावना कोअर टीमच्या काही सदस्यांमध्ये व्यक्त होत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नडा, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष या बैठकीला उपस्थित होते. श्रेष्ठींनी दोघांनाही सोमवारी दिल्लीला बोलावून घेतल्याने नेतृत्वबदल तसेच मंत्रिमंडळ फेररचनेच्या प्रश्नावरून राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा ठरला होता.

मुख्यमंत्री सावंत व राणे यांच्यातील संघर्ष टोकाला पोचल्याने दोघांनाही सोमवारी तातडीने दिल्लीत बोलावून घेण्यात आले. श्रेष्ठींनी दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व राणे यांनी काही मुद्दे मांडले. भुतानीसह मेगा प्रकल्पांसबंधी चालू असलेली आंदोलने, रेंगाळलेली नोकरभरती आदी विषयांवर चर्चा झाली. कर्मचारी भरती आयोगाबाबतही चर्चा झाली. दोघांनाही मतभेद संपवा आणि चांगल्या पद्धतीने काम पुढे न्या, असा सल्ला श्रेष्ठींनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी नोकरभरती राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फतच करण्याचा घेतलेला निर्णयही कळीचा मुद्दा ठरला. शाह यांच्यासमोर विश्वजित यांनी या गोष्टीला विरोध करून नोकरभरती खात्यांतर्गतच व्हायला हवी, अशी मागणी केली. श्रेष्ठींनीही खात्यांतर्गतच नोकरभरती करण्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे की नाही हे पुढील काळात स्पष्ट होईल. 'लोकमत'ने राणे यांना याविषयी विचारले असता, त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

यापुढे संघर्ष नको...

दिल्लीतील भेटीबद्दल दोघांनीही कोणतीही माहिती उघड करण्याचे टाळले. मात्र मंत्री सावंत व राणे यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली व आता यापुढे संघर्ष कायम संपावा, असे भाजप कोअर टीमच्या काही सदस्यांना वाटते. दोघांचे मनोमिलन व्हावे असे कार्यकर्त्यांनाही वाटते. या दोघांमधील वाद कायमचा संपणे कठीण याची कल्पना केंद्रीय नेतृत्वालाही आलेली आहे.

कार्यकर्ते जोशात 

दरम्यान, तूर्त कोणताही नेतृत्वबदल होणार नाही, हे दिल्लीतील भेटीनंतर स्पष्ट झाल्याने मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते, समर्थक जोशात आहेत. या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांचे धैर्य उंचावण्यासाठी 'भिवपाची गरज' ना मोहीम सुरू केली आहे.

सरदेसाईंचा हल्लाबोल 

दरम्यान, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, 'सरकारमधील दोन नेत्यांमधील संघर्षांचा विषय दिल्लीपर्यंत पोचला. एका बाजूने राज्यात धार्मिक सलोखा बिघडण्याची स्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे सत्तेतील दोन नेत्यांमधील वाद शिगेला पोचला आहे. या गोष्टींचा राज्यातील पर्यटन हंगामावर परिणाम होणार आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत