शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा; भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2024 12:41 IST

मुख्यमंत्री सावंत हे गेले दोन दिवस दिल्लीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: केंद्राच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केले. प्रमोद सावंत हे या बैठकीत सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच भाजपशासीत राज्यांचे १३ मुख्यमंत्री, १५ व उपमुख्यमंत्री उपस्थित होते. 

मोदी म्हणाले की, 'लोककल्याणासाठी केंद्र व राज्य सरकारनी समन्वयाने प्रयत्न केल्यास विकसित भारताचे स्वप्न निश्चितच आम्ही पूर्ण करू शकतो. लोकांपर्यंत योजना पोहचवण्यासाठी सोशल मीडियासह अन्य व्यासपीठांचा उपयोग करा, असे मोदींनी सुचवले. भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर पोचली पाहिजे, तसेच विकासकामांवर भर दिला पाहिजे,' असे ते म्हणाले.

नड्डा म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांच्या बैठका घेतल्याने तीन फायदे होतात. एक म्हणजे मोदी यांचे अनुभवी मार्गदर्शन सर्वांना मिळते. मुख्यमंत्री आपले म्हणणे मांडतात. त्यामुळे अनुभवांची देवाण-घेवाण होते व नवीन माहिती मिळते. तसेच आणखी काहीतरी नवीन करण्याची भावना बळावते.'केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत राज्यांनी कसे पुढे जावे याबद्दल मार्गदर्शन केले.

राज्याच्या विकासासाठी मोदींचे मार्गदर्शन : सावंत

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत हे गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. शनिवारी त्यांनी नीती आयोगाच्या बैठकीत सावंत यांनी राज्याच्या चौफेर विकासाबद्दल माहिती दिली होती. पायाभूत सुविधा, पर्यटन व आरोग्य क्षेत्रात राज्याचा सातत्याने विकास होत आहे, याबद्दल सांगितले होते. बैठकीनंतर सावंत यांनी पत्रकारांना असे सांगितले की, 'जनतेच्या सेवेसाठी मोदींनी बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले तसेच राज्याच्या सर्वागिण विकासासाठी कसे पुढे जावे हे सांगितले.'

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत