शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

घराघरातील संवाद तुटू लागला, मोबाईलचाच होतोय वापर: प्रशांत दामले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2024 09:59 IST

राष्ट्रीय जनसंपर्क दिन उत्साहात.

लोकमत न्यूज नेटवर्क,  वास्को : आजकाल घरातून संवाद कमी होत चालला आहे. आता घरात फक्त मोबाईलद्वारे मेसेज टाकून संवाद - साधून गप्प बसून एकमेकांना बघत राहणे एवढेच चालू आहे. त्यामुळे जनसंपर्क तुटत चालला आहे, असे प्रतिपादन भारतीय मनोरंजन उद्योग आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रशांत दामले यांनी केले.

वास्कोतील रवींद्र भवन बायणाच्या मनोहर पर्रीकर सभागृहात ४७ वा राष्ट्रीय जनसंपर्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भारतीय जनसंपर्क मंडळाच्या गोवा शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर भारतीय जनसंपर्क मंडळाच्या गोवा शाखेचे अध्यक्ष दीपक नार्वेकर, सचिव निखिल वाघ, ज्येष्ठ पत्रकार तसेच गोवा शाखेचे उपाध्यक्ष वामन प्रभू तसेच वास्को रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, गोव्यातील निवृत्त माहिती संचालक गुरूनाथ पै उपस्थित होते. गोवा शाखेचे सदस्य व कार्यकारी समितीचे सदस्य निकिता चोडणकर, जॉन्स सॅम्युअल व इतर मान्यवर उपस्थित होते.

दामले पुढे म्हणाले, प्रत्येकाच्या घरात डोकावून पाहिले तर तोंडी संवाद लुप्त होत चालले आहे. आपण किती बोलतो, कसं बोलतो यावरच आपला 'पीआर' अवलंबून आहे. जनसंपर्क हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. तेव्हा एकमेकांशी जास्तीत जास्त संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हाच आपला जनसंपर्क वाढण्यास मदत होईल.

मंडळाच्या गोवा शाखेतर्फे यावेळी प्रशांत दामले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव व संघटनेचे पदाधिकारी दीपक नार्वेकर, निखिल वाघ यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी दामले यांच्या हस्ते संघटनेच्या समाज माध्यमाचे अनावरण करण्यात आले. निखिल वाघ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन स्नेहल संझगिरी यांनी केले.

 

टॅग्स :goaगोवाPrashant Damleप्रशांत दामले