शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
2
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
3
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
4
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
5
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
6
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
7
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
8
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
9
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
10
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
11
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
12
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
13
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
14
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
15
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
16
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
17
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
18
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
19
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
20
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक

फुटिरांची फसगत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 12:52 PM

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बहुतांश आमदार फसले आहेत.

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बहुतांश आमदार फसले आहेत. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी आलेक्स व दिगंबर कामत यांच्याविषयी भाजप श्रेष्ठी कोणता निर्णय घेतात एवढेच पाहणे या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाती आहे.

आठ आमदारांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्या घटनेला आता दहा महिने झाले आहेत. येत्या जुलैमध्ये एक वर्ष पूर्ण होईल. गोव्यातील काँग्रेसचे आमदार हे लवकर सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली येत असतात. सत्ताधारी पक्षातली की, मग आपल्या मतदारसंघात विकासकामे होतात, आपल्यालाही सत्तेचे लाभ मिळतात, असे काँग्रेसच्या आमदारांना वाटते आणि ते मग भाजपमध्ये उडी टाकतात. भाजपला विरोधी पक्ष सातत्याने फुटलेले हवे असतात राजकारण हे असेच असते. 

आठ आमदारांपैकी काही आमदारांना वाटते की, भाजपमध्ये जाऊन आपण फसलो काही आमदारांना तर अपेक्षेप्रमाणे महामंडळही मिळाले नाही व मतदारसंघातही वेगाने कामे होत नाहीत. भाजपमध्ये गेलेल्या काही आमदारांच्या नावे अगोदरच पोलिसांत गुन्हे होते. काहीजणांविरुद्ध न्यायालयात खटले आहेत. भाजपमध्ये प्रवेश झाल्याने अशा आमदारांना थोडे संरक्षण मिळाले आहे. पोलिसांकडून आता समन्स देत नाहीत. शिवाय काही पोलिस स्थानकांचे अधिकारी नव्याने भाजपमध्ये आलेल्या आमदारांच्या थोड्या तरी सूचना ऐकतात. हा भाजपमध्ये जाण्याचा फायदा काही आमदार अनुभवतात. पण, मायकल लोबो, संकल्प आमोणकर, डिलायला, दिगंबर कामत किं नृवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांचे भाजप प्रवेशानंतर पूर्ण समाधान झालेले नाही. मंत्रीपद नाही महत्वाचे महामंडळ किंवा पीडीए वाट्याला आलेली नाही, आपले भवितव्य काय असा प्रश्न काही आमदारांना सतावतोय.

कर्नाटकमध्ये नुकतेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने फारच मोठे यश संपादन केले. त्यानंतर सोशल मीडियावर वेगळी चर्चा सुरू झाली. चर्चा अशी की, कर्नाटकचे काही काँग्रेस नेते केंद्रातील भाजपच्या विरुद्ध कर्नाटकमधील भाजप सरकारविरोधात संघर्ष करत राहिले. डी. के. शिवकुमार यांच्यासारख्या कर्नाटकच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाला तर तुरुंगातही जावे लागले होते. त्यांच्याविरुद्ध सीबीआय व ईडीकडून चौकशी सुरू आहे. मात्र, हे असे नेते कर्नाटकात भाजपला शरण गेले नाही. त्यांनी निवडणुकीत भाजपला जोरदार टक्कर देन घवघवीत यश मिळवले. पूर्ण देशाचे लक्ष कर्नाटकच्या काँग्रेसने स्वतकडे वेधून घेतले. ३४ वर्षानंतर काँग्रेसला कर्नाटकात एवढे भव्य यश प्राप्त झाले आहे. भाजपने कर्नाटक निवडणुकीत खूप पैसा खर्च केला, पण पराभव झाला. गोव्याहून जे भाजपवाले कर्नाटकात प्रचारासाठी गेले होते, त्यांना पैसा किती व कसा खर्च झाला ते ठाऊक आहे. काँग्रेसचे कर्नाटकचे नेते दबावाखाली न येता भी टक्कर देता ती टक्कर गोव्यातील काँग्रेस नेते का देऊ शकत नाहीत, ही सोशल मीडियावरील प्रश्नार्थक चर्चा आहे. 

गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकचेच नेते दिनेश गुंडू राव यांचे मार्गदर्शन लाभले होते. मायकल लोबो वगैरे तर पूर्णपणे दिनेश राव यांचे ऐकत होते. लोबो यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात दिनेश राव यांची त्यावेळी मोठी भूमिका होती. मात्र, लोबो यांनी अगोदर लिडर ऑफ अपनपद सोडले व मग पक्षही सोडला. दिगंबर कामत हेही एकावेळी विरोधी पक्षनेते होते. बाबू कवळेकर यांना देखील काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दिले होते. हे सगळे नेते गांवर काँग्रेसला गुड बाय म्हणून झालेतील संघर्ष करण्यास घाबरणारे नेते आपला पक्ष सोडून लवकर भाजपमध्ये जातात व त्यापैकी काहीजण पराभूत होऊन नंतर घरी बसतात. 

आज इजिदोर फर्नाडिस, बाकर किलीप मेरी क्लाफास डायस टोनी रॉड्रिग्ज, दयानंद सोपटे, मगोतून गेलेले बाबू आजगावकर, दीपक पाऊसकर असे अनेकजण घरी आहेत. भाजपमध्ये आपण गेली नसतो तर आज देखील आपण आमदार म्हणून विधानसभेत असतो, असे यापैकी काहीजण पत्रकारांना खासगीत सांगतात. जळगावच्यासह अनेक माजी आमदारांना भाजपमध्ये जाण्याची घाई झाली होती. ते सगळे पराभूत झालेले आहेत. यावेळी जे हरले त्यापैकी अनेकजण पुढील विधानसभा निवडणुकीत देखील पुन्हा जिंकून येण्याची शक्यता दिसत नाही. 

शिवाय दहा महिन्यांपूर्वी ज्या आमदारांनी भाजपमध्ये उही घेतली आहे, त्यापैकी केदार नाईक राजेश फळदेसाई, संकल्प, दोल्फ फर्नाडिस अशा काही आमदारांची पुढील निवडणुकीत कसोटीच आहे. काहीजण वन टाईम आमदार म्हणून इतिहासातनोंद होतील हे पूर्वीच्या अनुभवावरून सांगता येते. गेल्या जुलै महिन्यात आठ आमदार काँग्रेस पक्ष सोडून गेले. आता फक्त तीन आमदार राहिले आहेत. युरी आलेगाव यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद आहे. युरी काँग्रेसनिष्ठ आहेत. हळदोणेचे आमदारांचे मन कधी कधी स्थिर नसते. पेये आमदार एक्टन यांची मैत्री गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्याशी आहे. लोबो, कामत भाजपमध्ये गेले तेव्हा कामत यांच्या काही खास माणसांनी एल्टन यांनाही भाजपमध्ये नेण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. पण विजय आणि एका भाजप मंत्र्यानेच तो प्रयत्न हाणून पाडला. आता एल्टन काँग्रेसमध्येच राहतील, कारण भाजपचीही बसगाड़ी सध्या पूर्ण भरलेली आहे भाजपलाही आणखी आमदार नको आहेत.

आलेक्स सिक्वेरा यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी पक्षात घेतले तेव्हा मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांना मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. संकल्प आमोणकर यांना आपल्याला देखील मंत्रीपद मिळेल, असे वाटत होते. संकल्प व आलेक्सचा अपेक्षाभंग झाला आहे. संकल्प यांना महत्वाचे असे कोणतेच महामंडळही मुख्यमंत्री देऊ शकले नाहीत. रुदोल्फ फर्नांडिस है सांताक्रूझचे आमदार तेवढे समाधानी आहेत. कारण त्यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये जाताना मोठे बक्षिस देण्याची ग्वाही भाजपने दिली होती. ते बक्षिस दोल्फना मिळाले. आलेक्स सिक्वेरा यांना खरोखर मंत्रीपद देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री सावंत यांनी करून पाहिला. मात्र, आणखी खिस्ती मंत्री मंत्रिमंडळात नको, अशी भूमिका संघाची आहे. हिंदू मंत्र्याला डच्चू देऊन ख्रिस्तीधर्मिय मंत्री वाढवू नका. ही संघाची भूमिका मुख्यमंत्री सावंत यांनाही कळाली आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोवा मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास मान्यता दिलेली नाही. कर्नाटक निवडणुकीमुळे भाजपला दिसून आलेच की, अल्पसंख्यांची ८० टक्के मते काँग्रेसला मिळाली आहेत त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व अधिक सतर्क झाले आहे. आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद दिले म्हणून दक्षिण गोव्यात भाजपची खिस्ती मते लोकसभा निवडणुकीत वाढतील, अशी स्थिती मुळीच नाही, हे गोवा भाजपच्याच काही मंत्री व आमदारांनी दिल्लीत सांगितले आहे. 

आलेक्सना मंत्रीपद मिळणे आता अधिक कठिण झाले आहे.दिगंबर कामत यांना भाजपने अजून पक्षात महत्वाचे पद दिलेले नाही. त्यांना ते पुढे मिळू शकते. मात्र मंत्रीपद मिळण्याची नाही. लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिणेतून कामत यांना तिकीट दिले जाईल, असा दावा देखील काही भाजप पदाधिकारी करतात. वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्याकडे पीडीए आहे. कामत यांना मंत्रिपद देऊन टीसीपी खाते त्यांच्याकडे सोपवले जाईल, अशी चर्चा कामत यांचे दोन खास कार्यकर्ते अधूनमधून पसरवतात. कामत यांचे यापुढे राजकीय भवितव्य काय हे गृहमंत्री अमित शाह यांनीही अजून स्पष्ट केलेले नाही. शाह यांना अलिकडेच कामत भेटले आहेत.

मायकल लोबो यांना भाजपने अजून पूर्णपणे आपले मानलेले नाही. हा टर्म पूर्ण होईपर्यंत तरी लोबो यांना महत्त्वाचे महामंडळ वगैरे मिळणार नाही हे मायकल यांनाही स्वतला ठाऊक आहे. लोबो यांचे सर्वच राजकीय निर्णय गेल्या दोन वर्षात चुकत गेले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बहुतांश आमदार फसले आहेत. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी आलेक्स व दिगंबर कामत यांच्याविषयी भाजप श्रेष्ठी कोणता निर्णय घेतात एवढेच पाहणे या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाती आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण