शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

कचऱ्याऐवजी तिजोरीच साफ केली; भाजपा सरकारवर काँग्रेसची तोफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:20 IST

भाजपा सरकार अपयशी ठरल्याचा दावा

पणजी : गोवा  सरकारच्या सुमार कामगिरीवर तोफ डागताना प्रदेश काँग्रेसने वेगवेगळ्या निकषांवर सरकार अपयशी ठरल्याबद्दल टीकेची झोड उठविली आहे. पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेसचे संवाद विभागप्रमुख ट्रोजन डिमेलो म्हणाले की, ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात दहा निकष लावून केलेल्या सर्वेक्षणात सरकारची कामगिरी अगदीच सुमार आढळून आलेली आहे. रोजगार संधी, कचरा विल्हेवाट, दर नियंत्रण या बाबतीत सरासरीपेक्षाही बरेच कमी गुण राज्य सरकारला मिळाले आहेत.’ स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत तिजोरी साफ केली. मात्र कचरा काही साफ झाला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचे सोडून आहेत त्याही गमावल्या. खाणी बंद झाल्याने लोकांचा रोजगार गेला. नोटाबंदीमुळे देशभरात नोकऱ्या गेल्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधांच्या बाबतीतही सरकार अपयशी ठरले. हा अहवाल नजरेसमोर ठेवून लोकसभेसाठी आगामी निवडणुकीत दोन्ही जागा तसेच विधानसभेच्या तीन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीत जनता भाजपला धुडकावून लावील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाचे प्रवक्ते अ‍ॅड. रोहित ब्रास डिसा म्हणाले की, ‘या अहवालाबाबत मुळीच प्रश्न उपस्थित करता येणार नाही. कारण शास्रोक्त पद्धतीने तो तयार करण्यात आला आहे. राज्यात भाजप आघाडी सरकार सुशिक्षितांना नोकऱ्या देऊ शकलेले नाही. कचरा विल्हेवाटीच्या प्रश्नावर न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले.’

मुख्यमंत्र्यांच्या विधानाला आक्षेप दरम्यान, कारवार येथे निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कन्नडिगांना गोव्यात नोकºया देण्याचे जे कथित विधान केले त्याला काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. डिमेलो यांनी या विधानाला हरकत घेताना ‘गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण’ याचा उद्घोष करणारे गप्प का असा सवाल केला आहे. पत्रकार परिषदेस अमरनाथ पणजीकर तसेच अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे सचिव शंकर गौडा पाटील हेही उपस्थित होते.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस