शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विश्वजित राणेंच्या अपात्रतेसाठी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 20:34 IST

पर्रिकर सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेले विश्वजित राणो यांना अपात्र ठरविले जावे म्हणून काँग्रेस पक्षाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राणो यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सभापतींनीच अगोदर निवाडा देऊ द्या, अशी भूमिका घेऊन काँग्रेसची याचिका

पणजी -  पर्रिकर सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेले विश्वजित राणो यांना अपात्र ठरविले जावे म्हणून काँग्रेस पक्षाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राणो यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सभापतींनीच अगोदर निवाडा देऊ द्या, अशी भूमिका घेऊन काँग्रेसची याचिका निकालात काढल्यानंतर आता हायकोर्टाच्या या निवाडय़ाला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

विश्वजित राणे यांनी 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्यानंतर व आमदारकीची शपथ घेतल्यानंतर लगेच आमदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र राजीनामा देण्यापूर्वी काही तास अगोदर ते गेल्या मार्चमध्ये विधानसभेत र्पीकर सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहात अचानक अनुपस्थित राहिले होते. आमदारकी सोडून ते भाजपमध्ये गेले व भाजपच्या तिकीटावर पोटनिवडणुकीत जिंकून आले. तथापि, विश्वजित यांची कृती ही अपात्रतेला निमंत्रण देणारी ठरती असा दावा काँग्रेसने करून उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. गेल्या ऑक्टोबरमध्ये न्यायालयाने आपण या याचिकेवर निर्णय देऊ शकत नाही, अगोदर सभापतींकडे निर्णय होऊ द्या, असे स्पष्ट केले होते. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेही विश्वजितविरुद्धची अपात्रता याचिका आहे पण ती सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी सादर केली आहे. गावकर यांनी याचिका सादर करण्यामागिल हेतू वेगळा असल्याचे काँग्रेसचे म्हणणो आहे.

2022 सालार्पयत म्हणजे पुढील पाच वर्षासाठी राणो यांना अपात्र ठरविले जावे, अशी काँग्रेसची उच्च न्यायालयासमोर याचिका होती. तथापि, ती याचिका निकालात काढताना न्यायालयाने तक्रारदाराने अगोदर सभापतींकडे जावे व सभापतींच्या निर्णयाची छाननी करण्यासाठी मग न्यायालयाकडे जाता येईल असे म्हटले होते. काँग्रेसने उच्च न्यायालयाच्या या निवाडय़ाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राणो यांनी काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचा व्हीप पाळला नाही व त्यामुळे घटनेच्या 191 कलमाखाली ते पाच वर्षासाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतात व मंत्री म्हणूनही अपात्र ठरतात, असे काँग्रेसचे म्हणणो आहे. तसेच सभापतींच्या कक्षेत विश्वजित राणो यांचा विषयच येत नाही, अशीही काँग्रेसची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसने याचिका सादर केल्याच्या वृत्ताला काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी गुरुवारी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस