शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

'क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टुमारो' युवकांना चित्रपट सृष्टीत येण्याचे व्यासपीठ-अनुराग सिंग ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 17:53 IST

केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांचे उद्गार.

पणजी:  'क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टुमारो' हा देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुणांना  प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.  मीडिया आणि एंटरटेनमेंटच्या क्षेत्रात अतुलनीय संधी त्यांना प्राप्त करुन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकुर यांनी सांगितले. पणजीत सुरु असलेल्या इफ्फीमध्ये त्यांच्या हस्ते ७५  क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो या युवा कलाकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच मंत्र्याच्या हस्ते '४८ तास फिल्म चॅलेंजचेही लाँच करण्यात आले. 

 मंत्री ठाकुर म्हणाले,  'क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टुमारो' हे युवक देशातील कानाकोपऱ्यातून पुढे येत असतात. गेली  तीन वर्षे इफ्फीत हा उपक्राम सुरु आहे .यात अनेक  युवा कलाकार सहभागी होत आहेत. गेल्या वर्षी याला चांगला प्रतिसाद लाभला त्यांना येथे याेग्य असे व्यासपीठ मिळत आहे. या वर्षीचे ७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो भारतातील तब्बल १९ विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत, ज्यात बिष्णुपूर (मणिपूर), जगतसिंगपूर (ओडिशा) आणि सरदारपूर (मध्य प्रदेश) या ठिकाणांचा समावेश आहे, असेही मंत्री म्हणाले.   फिल्म चॅलेंजचा एक भाग म्हणून, ७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो सहभागींना पाच संघांमध्ये विभागण्यात आले होते जे ४८ तासांत 'मिशन लाइफ' या विषयावर लघुपट बनवतील. चित्रपट महोत्सवादरम्यान, हे युवा जागतिक सिनेमाच्या मास्टर्सद्वारे तयार केलेल्या कार्यशाळा आणि मास्टरक्लास सत्रांना देखील उपस्थित राहतील, असेही मंत्र्यांनी सांगितले.

 मंत्री ठाकूर पुढे म्हणाले, चित्रपट निर्मिती ही केवळ आशयाची निर्मितीच नाही, तर प्रेक्षकांपर्यंत त्याचे विपणन आणि वितरण देखील आहे. तसेच तरुणांमध्ये आणि उद्योगांमध्ये नेटवर्किंग आणि सहयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी चित्रपट महत्वाचा आहे. यावर्षी इफ्फी टॅलेंट कॅम्प आयोजित केले आहे, जिथे हे ७५ क्रिएटिव्ह माइंड्स अनेक प्रसिद्ध उत्पादनांच्या प्रतिनिधींना भेटतील, संवाद साधतील आणि त्यांच्याशी संपर्क साधतील.   मंत्र्यांच्या हस्ते या ७५ क्रिएटिव्ह माइंड्समधील सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

 भारत जगातील तिसरा मोठा स्टार्टअप इकोसिस्टमस्टार्ट-अपसाठी सरकारने दिलेल्या पाठिंब्यावर लक्ष केंद्रित करून मंत्री म्हणाले, नवीन स्टार्ट-अप धोरणामुळे, देशातील एक लाखाहून अधिक स्टार्ट-अप्ससह भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्ट-अप इकोसिस्टम म्हणून उदयास आला आहे. दररोज एक नवीन स्टार्टअप येत आहे. कोविड १९ महामारीच्या काळात मोठ्या कंपन्या देखील संघर्ष करत असताना, भारतातील पन्नास स्टार्टअप्स भारतीय तरुणांच्या शक्तीचे प्रदर्शन करून युनिकॉर्नच्या पातळीवर उंचावले आहेत, असे मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. या कार्यक्रमात शॉर्ट्स टीव्हीचे सीईओ आणि संस्थापक कार्टर पिल्चर, युरोपियन फिल्म मार्केटचे संचालक डेनिस रुह, द आर्चीजचे कार्यकारी निर्माता जॉन गोल्डवॉटर, नीरजा शेखर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

टॅग्स :goaगोवाAnurag Thakurअनुराग ठाकुरMediaमाध्यमे