शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

शॅकची मुदत वाढविण्याचा विचार सोमवारी निर्णय; पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांचे वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2024 16:19 IST

शॅकची मुदत वाढविण्याचा विचार करुन सोमवारपर्यंत हवामान विभागाशी चर्चा करुन योग्य निर्णय घेणार असल्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.

नारायण गावस, पणजी : बीच शॅक धारकांनी पर्यटन खात्याकडे मान्सून अद्याप सुरु झाला नसल्याने शॅक्स हटविण्याची ३१ मे ची अंतिम मुदत आणखी वाढविण्याची मागणी केली आहे.  शॅकची मुदत वाढविण्याचा विचार करुन सोमवारपर्यंत हवामान विभागाशी चर्चा करुन योग्य निर्णय घेणार असल्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.

मंत्री रोहन खंवटे यांनी शनिवारी सांगितले की, त्यांची मागणी लक्षात घेऊन राज्य सरकार मुदत वाढविण्याचा विचार करत आहे. हवामानाच्या परिस्थितीनुसार मुदत वाढविली जाणार. आम्ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेऊ पण शॅक मालकांनी पर्यटकांच्या सुरक्षेची खात्री केली पाहिजे, असे खंवटे म्हणाले.

मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, राज्यातील हवामान पाहता पर्यटन खात्याने शॅक्सना ३१ मे ही अंतिम मुदत दिली होती. परंतु सध्या देशी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. तसेच शॅक्स संघटनांनी मुदत वाढीची मागणी केली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगास यांनीही पत्र लिहून बीच शॅक्सची मुदत वाढवण्याची मागणी केली होती.

मंत्री खंवटे म्हणाले शॅक मालक, वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर, पारंपरिक मच्छीमार यांच्यासह संबंधितांनी एक इको-सिस्टीम म्हणून एकत्र काम केले पाहिजे. समुद्रकिनाऱ्यावर जे घडत आहे त्याची जबाबदारी संबंधितांनी घेतली पाहिजे. जर काही चूक झाली तर राज्य सरकारला दोष देण्याची प्रवृत्ती आहे. पर्यटन खात्याला संबंधितांची समस्या समजते आणि विभाग त्यांच्या पाठीशी आहे. खाते आगामी पर्यटन हंगामात समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनाशी संबंधित नियम लागू होतील याची खात्री करेल.

सुरक्षित पर्यटन स्थळांचा आनंद घ्या-

बंद खाणीत बुडून मृत्यू आणि इतर धोकादायक ठिकाणे याविषयी बाेलताना मंत्री खंवटे म्हणाले, पर्यटकांनी जबाबदारीने वागावे प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. धाेकादायक ठिकाणावर जाऊ नका, असे आम्ही परिपत्रक काढले आहे.

खाण मालकांनी क्षेत्रांना कुंपण घालणे गरजेचे आहे, पण तसे केले जात नाही. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला जबाबदार धरले जाते. युवकांनी सुरक्षित ठिकाणच्या पर्यटन स्थळांचा आनंद घ्यावा. एखादा तरुण बुडून मृत्यू हाेणे हे त्यांच्या कुटुंबाप्रमाणे राज्याचेही मोठे नुकसान आहे. पर्यटन खाते या विषयी जनजागृती करणार आहे.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन